शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या विधानाचा मच्छीमारांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:58 IST

मच्छीमार कृती समिती; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

पालघर : पर्ससीन नेट आणि अत्याधुनिक ट्रॉलर्स पद्धतीमुळे मत्स्य प्रजाती नामशेष होत नाहीत किंवा जलप्रदुषणात वाढही होत नाही, असे विधान मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने तीव्र शब्दात निषेध केला असून किनारपट्टी भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी विरोधीपक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, आ. भास्कर जाधव, योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पर्ससीननेट किंवा अत्याधुनिक ट्रॉलर्समुळे जलप्रदुषणात वाढ होत नाही किंवा माशांच्या प्रजाती नामशेष होत नाही, असे उत्तर दिल्याने कृती समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री शेख यांनी याचा खुलासा करावा अथवा जगातील मत्स्यतज्ज्ञांचे अहवाल वाचून नंतरच याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त करावे असे कृती समितीने सांगितले.पर्ससीन नेट आणि ट्रॉलर्स अशा अत्याधुनिक साहित्याच्या आधारे मोठ्या माशांचे थवेच्या थवे पकडले जाऊ लागल्याने मत्स्यसंपदेची मोठी घसरण सुरू झाली. मोठे आर्थिक उत्पन्न देणाऱ्या माशांच्या थव्यांचा शोध घेत यांचे महाकाय ट्रॉलर्स परंपरागत मासेमारी करणाºया लहान मच्छीमारांच्या भागात जबरदस्तीने शिरकाव करू लागले. त्यांच्या जाळ्यांचे, कवींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून शेकडोंच्या कळपाने येत दहशत माजवत आहेत. त्यामुळे या दहशतीच्या विरोधात सर्व मच्छीमार संघटना एकत्र झाल्या. सोबत नॅशनल फिश वर्कर्स फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेने केंद्रात याविरोधात लढा सुरू केल्यानंतर केंद्रीय माजी मत्स्योद्योग मंत्री राधा मोहनसिंग यांनी पर्ससीन आणि ट्रोलिंग पद्धतीवर बंदी घातली होती. त्यामुळे राज्यातील सर्व किनाऱ्यांवरही ही बंदीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मधल्या काळात राज्याचे माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनीही पर्ससीन नेट मासेमारीला अभय देण्याची भूमिका घेतल्यावर मच्छीमार संघटनांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.वादळ आणि अतिवृष्टीमुळे मच्छिमारांचे यंदा मोठे नुकसान झाल्याने मच्छीमारांच्या मागणीनुसार नुकसानभरपाईचा अहवाल येत्या आठवड्यात तयार करण्याचे आदेश मंत्री शेख यांनी दिले आहेत. परंतु सभागृहात विरोधकांना दिलेली उत्तरे आणि शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन यात विरोधाभास असल्याचे मत कृती समितीने स्पष्ट केले आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार नेहमीच शिवसेनेच्यामागे खंबीरपणे उभे राहिले असताना त्यांच्यावर मत्स्य दुष्काळासह नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात किनारपट्टीवरील परिस्थिती पहावी. जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये. - कुंदन दवणे, मच्छीमार