शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 01:58 IST

मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली.

पालघर : अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मुरब्याच्या ‘आई एकवीरा’ या बोटीतील १६ मच्छीमार जाळी समुद्रात टाकून झोपले असताना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता एका मोठ्या जहाजाने दिलेल्या धडकेमुळे ती बोट शेकडो फूट फरफटत गेली. या बोटीचे नुकसान झाले असून सुदैवाने १६ मच्छीमार बचावले आहेत.मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली. मोठ्या आनंदाने मच्छीमारांचे कुलदैवत असलेल्या ‘आई एकविरा’ असे नाव बोटीला देऊन त्यांनी मासेमारीला सुरूवातही केली होती. २ आॅक्टोबर रोजी सर्व मच्छिमार आपली बोट घेऊन मच्छीमारीला निघाले. बोट खोल समुद्रात ३० नॉटिकल समुद्री मैलावर असलेल्या आपल्या कवी जवळ पोहचल्यावर त्यांनी आपल्या बोटीतील जाळी मांडून तीन बल्ब लाऊन ते झोपले.पहाटे ते साखर झोपेत असताना त्यांच्या बोटीला धडक बसल्याने सर्व खडबडून जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता आपल्या बोटीच्या अँकरला लावलेला दोरखंड त्या मोठ्या जहाजाला अडकून ती बोट फरफटत जात असल्याने सर्व घाबरून बोटीत एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने जहाजाला अडकलेला दोरखंड तुटल्याने बोट जहाजपासून वेगळी झाली. या घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाल्याचे सुनील तरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदर झाल्यास मोठ्या जहाजांची वाहतूक वाढून मच्छीमारांना याचा त्रास सहन करावा लागले असे बोलले जात आहे.खोल समुद्रातून ये-जा करताना मोठ्या जहाजाने आपल्या मार्गात येणाऱ्या लहान जहाजांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा द्यायचा असतो. परंतु ‘आई एकविरा’ बोटीला तीन बल्ब लावलेले असतानाही आम्हाला कुठलाही इशारा न देता आमच्या बोटीला धडक मारून ते जहाज निघून गेले. त्या जहाजाला अडकलेला दोरखंड तुटला नसता तर आम्ही सर्व १६ जण बोटीसह त्या जहाजाच्या खाली सापडून मृत्युमुखी पडलो असतो.- सुनील तरे, बोट मालक.वाढवण बंदर झाल्यास मोठ्या बोटीची ये-जा वाढणार असून मच्छीमार बोटींना धोका वाढणार आहे.- राजन तरे, सामाजिक कार्यकर्ते, मुरबे

 

टॅग्स :palgharपालघर