शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 01:58 IST

मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली.

पालघर : अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मुरब्याच्या ‘आई एकवीरा’ या बोटीतील १६ मच्छीमार जाळी समुद्रात टाकून झोपले असताना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता एका मोठ्या जहाजाने दिलेल्या धडकेमुळे ती बोट शेकडो फूट फरफटत गेली. या बोटीचे नुकसान झाले असून सुदैवाने १६ मच्छीमार बचावले आहेत.मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली. मोठ्या आनंदाने मच्छीमारांचे कुलदैवत असलेल्या ‘आई एकविरा’ असे नाव बोटीला देऊन त्यांनी मासेमारीला सुरूवातही केली होती. २ आॅक्टोबर रोजी सर्व मच्छिमार आपली बोट घेऊन मच्छीमारीला निघाले. बोट खोल समुद्रात ३० नॉटिकल समुद्री मैलावर असलेल्या आपल्या कवी जवळ पोहचल्यावर त्यांनी आपल्या बोटीतील जाळी मांडून तीन बल्ब लाऊन ते झोपले.पहाटे ते साखर झोपेत असताना त्यांच्या बोटीला धडक बसल्याने सर्व खडबडून जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता आपल्या बोटीच्या अँकरला लावलेला दोरखंड त्या मोठ्या जहाजाला अडकून ती बोट फरफटत जात असल्याने सर्व घाबरून बोटीत एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने जहाजाला अडकलेला दोरखंड तुटल्याने बोट जहाजपासून वेगळी झाली. या घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाल्याचे सुनील तरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदर झाल्यास मोठ्या जहाजांची वाहतूक वाढून मच्छीमारांना याचा त्रास सहन करावा लागले असे बोलले जात आहे.खोल समुद्रातून ये-जा करताना मोठ्या जहाजाने आपल्या मार्गात येणाऱ्या लहान जहाजांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा द्यायचा असतो. परंतु ‘आई एकविरा’ बोटीला तीन बल्ब लावलेले असतानाही आम्हाला कुठलाही इशारा न देता आमच्या बोटीला धडक मारून ते जहाज निघून गेले. त्या जहाजाला अडकलेला दोरखंड तुटला नसता तर आम्ही सर्व १६ जण बोटीसह त्या जहाजाच्या खाली सापडून मृत्युमुखी पडलो असतो.- सुनील तरे, बोट मालक.वाढवण बंदर झाल्यास मोठ्या बोटीची ये-जा वाढणार असून मच्छीमार बोटींना धोका वाढणार आहे.- राजन तरे, सामाजिक कार्यकर्ते, मुरबे

 

टॅग्स :palgharपालघर