शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कचेरी अस्वच्छतेत पहिली

By admin | Updated: March 28, 2016 02:25 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत अस्वच्छता, प्रचंड दुर्गधी, घाणेरडे आणि सोयीसुविधांचा अभाव असलेले सरकारी कार्यालय असल्याचा

- शशी करपे,  वसई केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात केंद्रीय पथकाने केलेल्या पाहणीत अस्वच्छता, प्रचंड दुर्गधी, घाणेरडे आणि सोयीसुविधांचा अभाव असलेले सरकारी कार्यालय असल्याचा ठपका वसई तहसिल कार्यालयावर ठेवण्यात आला आहे. पथकाने एकही गुण दिला नसल्याने स्वच्छतेत वसई तहसील कार्यालयाचा शेवटचा क्रमांक लागला. तर वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयाने स्वच्छता अभियानात सर्वाधिक गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. केेंद्र सरकारच्या नगरविकास खात्यामार्फत देशभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. त्यानुसार देशातील सर्व महापालिका कार्यालये, सरकारी कार्यालयांची तपासणी करण्यात आली. दि क्वॉलिटी आॅस्ट्रीया सेंट्रल आशिया प्रा. लि. या संस्थेमार्फत वसई तालुक्यात १९ मार्च ते २१ मार्च दरम्यान चार केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील केंद्र, राज्य, निमसरकारी अशा एकूण २५ कार्यालयांची तपासणी करण्यात येऊन त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. तपासणी मोहिमेत शौचालये, मुतारी, वॉश बेसीन यांची उपलब्धता आणि कार्यशिलता यांची तपासणी करण्यात आली. तसेच कार्यालयातील आवश्यक त्या प्रमाणात कचरा पेट्यांची संख्या, दालने, दालना बाहेरील जागा व जीने यांची स्वच्छता तपासण्यात आली. त्यासाठी विविध निकषांवर २० गुण निर्धारित करण्यात आले होते. त्यात सर्वाधिक १८ गुण पटकावून वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयाने पहिला क्रमांक पटकावला. याआधी दि क्वॉलिटी काऊन्सिल आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या तपासणीत महापालिकेने देशातील ७५ शहरांमध्ये ३५ वा क्रमांक पटकावला होता. आता पहिला क्रमांक पटकावून सरकारी कार्यालयांमधील स्वच्छतेत सगळ्यांना मागे टाकले आहे. पालिका अधिक स्वच्छ, नियोजनबद्ध, गतीमान कारभार करील, लोकांना चांगल्या सुविधा पुरवेल असा विश्वास पालिकेचे सह आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, केेंद्रीय पथकाच्या पाहणीत वसईचे तहसील कार्यालया सर्वाधिक घाणेरय्ऋे, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि सोयी सुुविधांचा अभाव असलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयाला पथकाने एकही गुण दिला नाही. तहसिल कार्यालय दररोज हजारो लोकांची ये-जा असते. पण, कार्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कार्यालयाच्या तळमजल्यावर कँटीन शेजारी अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेले स्वच्छतागृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या मजल्यावर असलेले स्वच्छतागृहही अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडे आहे. कार्यालयात दाखले, सरकारी कागदपत्रे, जमिनीचे दावे, रेशनिंग, निवडणुकीची कामे अशा विविध कामांसाठी दररोज शेकडो लोक येत असतात. पण, त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह नाही. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. तर नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. सध्या तहसिल कचेरीने महसूलपोटी लोकांकडून ८२ कोटी गोळा केले आहेत. पण, लोकांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात तहसिल कचेरी अपयशी ठरत असल्याचे केंद्रीय पथकाने चव्हाट्यावर आणले आहे. महत्वाचे म्हणजे वसईतील अनेक तहसिलदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकले होते. यातील एक जण सध्या तुरुंगात असून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून गायब झालेला नितीश ठाकूर यानेही वसईत तहसिलदार म्हणून काम केले होते. भ्रष्टाचारात सतत प्रकाशझोतात असलेले तहसिल कार्यालय स्वच्छतेच्या बाबतीत मागास राहिले आहे. प्रांताधिकारी कार्यालयाने १६ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे.