शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते!

By admin | Updated: April 2, 2016 02:57 IST

काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम

वसई : काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम तो गंध आपल्याला भेटतो आणि जगभरातल्या सर्व प्रकारच्या प्रदूषणांनंतरही आपण तो गंध कधीही विसरत नाही. माणूस सर्वकाही विसरून जातो, पण ज्या दिवशी हातात नवंकोरं पुस्तक आलेलं होतं, तो दिवस आपल्या कायमच स्मरणात राहिलेला असतो. ओल्या मातीचा गंध आणि नव्याकोऱ्या पुस्तकाचा गंध आपल्या स्मरणकुपीत कायमच एकत्र वास करीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाच्या निमित्ताने वसईतील बालसाहित्यिक व कवी सायमन मार्टिन यांनी लोकमतशी संवाद साधताना वाचनाची महती सांगितली.पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून जिवंत झाडाचं कलेवर असते. आपलं सर्वस्व देऊन झाड पुस्तकाच्या रूपाने आपल्याला भेटायला आलेलं असतं. त्यात झाडाचा आत्मा असतो. जेव्हा पुस्तकाच्या सोबत आपण असतो, तेव्हा आपण झाडाच्या सावलीतच असतो. बालपणी रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली जी पुस्तकं भेटलेली असतात, ती आपण कशी विसरू शकतो? पुस्तकावाचून कुणाचंही बालपण जाऊ नये, पण जगभरात अशी असंख्य छोटी मुलं असतात की, ज्यांच्या भाग्यात नवीन कोऱ्या पुस्तकांचा सहवासच नसतो. त्यामुळे त्यांचं बालपण एकतर खुरटून गेलेलं असतं किंवा करपून गेलेलं असतं, असेही त्यांनी सांगितले.छोट्या मुलांची शाळा भरलेली आहे आणि गरिबीमुळे शाळेची पायरी चढू न शकलेली मुलं आशाळभूतपणे त्या शाळेच्या इमारतीकडे व शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पाहत आहेत, असं चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यापुढचं सर्व शिक्षण पुस्तकांशिवाय होऊ लागलंय. त्याचे फायदे-तोटे असू शकतात, पण पुस्तकाचा स्पर्श, रूप, रंग, गंध आणि सहवास मुलांना माणूस म्हणून घडवण्यासाठी अत्यावश्यक असतो. समाजातला ओलावा संपून जातो तेव्हा मुलांचा विचार बाजूला पडतो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) सर्व प्रयत्न करून छोट्याचं भावविश्व समृद्ध करणारी अगणित पुस्तकं छापली जायला हवीत, ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवीत. गावागावांत बालवाचनालयं हवीत. त्यासाठी तरतूद हवी. उत्तम रस्ते, सुंदर घरं होत राहतील, पण बालमनावर संस्कार करणारी पुस्तकं नसतील तर बाप हो, विनाशाकडे आपण कायम प्रवास करीत राहू. - सायमन मार्टिन, कवी-साहित्यिक