शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अखेर ‘त्या’ खलाशांची गुजरातमधून होणार सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 06:21 IST

लोकमत इफेक्ट : जिल्हाधिकाऱ्यांचे मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यातील पोरबंदर, वेरावल येथे मच्छीमारीनिमित्त गेलेल्या हजारो खलाशी कामगारांना मरणयातना भोगाव्या लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतली असून त्यांना पुन्हा घरी आणण्याबाबत राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र पाठविले आहे.गुजरात राज्यातून पोरबंदर, वेरावल येथील बंदरांत मासेमारी करणाºया ट्रॉलर्सवर डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार आदी भागातून सुमारे ५०० ते ६०० आदिवासी, माच्छी आदी समाजातील गरीब खलाशी कामगार म्हणून कामाला जात असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोरबंदर, वेरावल येथील मासेमारी बंद करण्यात आल्याने मरोली, नारगोल, उंबरगाव, कोसंबा आदी भागातून गेलेल्या ट्रॉलर्स माघारी परत आल्या होत्या.गुजरातच्या पोरबंदर, वेरावल आदी बंदरातील ट्रॉलर्सवर कामगार म्हणून कामावर गेलेल्या कामगारांना २७ ट्रॉलर्समधून सुमारे १ हजार ८०० खलाशी कामगार गुजरातच्या नारगोल बंदरात शुक्रवारी (३ एप्रिल) आणण्यात आले होते. त्यांना स्थानिकांनी उतरू दिले नाही. मात्र गुजरात प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्तीनंतर रविवारी (५ एप्रिल) दुपारी त्यांना उतरविण्याची कार्यवाही सुरू असताना गुजरात राज्यातील फक्त ११२२ कामगारांना ट्रॉलर्समधून खाली उतरविण्यात येऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.उरलेले ६७८ कामगार हे पालघर जिल्हा आणि दमण-सिल्वासातील असल्याने त्यांना उतरविण्यास गुजरात पोलिसांनी नकार दिला. या ६७८ कामगारांना पुन्हा पोरबंदर, वेरावल येथे सोडून देण्याचा अट्टाहास वलसाड पोलिसांनी लावून धरला होता. यादरम्यान दमण-सिल्वासा येथील जिल्हा प्रशासनाने गुजरात प्रशासनाशी बोलून आपल्या कामगारांना ृआपल्या भागात प्रवेश दिल्याचे जिल्ह्यातील कामगारांचे म्हणणे आहे. उर्वरित पालघर जिल्ह्यातील सुमारे ५५० ते ६०० कामगार समुद्रात ट्रॉलर्समध्ये अन्नपाण्यावाचून अडकून पडले असताना त्यांच्या आरोग्याचा, जीविताचा गहन प्रश्न निर्माण झाला असताना महाराष्ट्र सरकारने काही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे शासन पातळीवरून दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्ह्यातील या सर्व कामगारांना पुन्हा पोरबंदर, वेरावलमध्ये नेऊन ठेवण्यात आले होते. तेथे त्यांची एनएफएफ या मच्छीमार संघटनेकडून जेवण, पाण्याची व्यवस्था केली जात असताना खलाशांची १८ ते २० हजारांची संख्या पाहता त्यांना मर्यादा येत होत्या. त्यामुळे आम्हाला पुन्हा आमच्या घरी आणण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, अशी मागणी जिल्ह्यातील खलाशांनी केली होती.या खलाशांना सुखरूपपणे त्यांच्या घरी आणण्याची मागणी भाजपचे पदाधिकारी तथा आदिवासी एकता मित्र मंडळ, मनोरचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र लिहून गुजरातमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील आदिवासी मच्छीमार मजुरांना घरी आणण्याबाबत पत्र पाठवले आहे.उद्धव ठाकरे यांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील खलाशांना कुठलाही त्रास न होता योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असून १४ एप्रिलनंतर त्या खलाशांना पुन्हा आपल्या घरी आणण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून प्रयत्न सुरू केले जातील, असे शिवसेनेचे आमदार तथा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या