शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

By admin | Updated: September 15, 2015 23:05 IST

गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने

ठाणे : गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून धाडसत्रही सुरू केले आहे. गुजरातमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर खवा येतो. तसेच तो पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातूनही येतो. अनेकदा त्यात भेसळ असते. तसेच तो शिळा असतो. अशा खव्यात पूर्वी विषबाधा होण्याच्या घटना घडल्याने त्याविरुद्ध आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई एफडीएने सुरू केली आहे. शहा मणीलाल नरसी या फर्मवर धाड घातली असता शुद्ध पामतेलाच्या डब्यात तळणासाठी वापरून उरलेले खाद्यतेल भरलेले असल्याचे आढळून आले. तर कोपरखैरणे येथे मिठाईच्या दुकानावर धाड घातली असता काजूरोल या मिठाईत भेसळ केली असल्याचे आढळून आले. या दोन्ही धाडी शनिवारी घालण्यात आल्या. हे धाडसत्र अधिक व्यापक केले जाणार आहे. खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी उकडलेले बटाटे, रताळी, आरारुटची पावडर, तांदुळ आणि मैदा आदींचा वापर केला जातो. त्यातून अनेकदा विषबाधाही होऊ शकते. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात खव्यातल्या भेसळील अधिक ऊत येतो. म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. खव्याचे एकूण पाच प्रकार असतात. त्यातला पहिला असतो बाटी या खव्यात मॉईश्चर कमी असते. दुसऱ्याला चिकना म्हणतात. त्यामध्ये ५० टक्के मॉईश्चर असते. त्याचा वापर फॅन्सी मिठाईसाठी होतो. तिसऱ्या प्रकाराला दाणेदार असे म्हणतात. त्याचा वापर कलाकन आणि विविध प्रकारच्या बर्फी तयार करण्यासाठी होतो. तसेच पिंडी नामक खवा पेढे तयार करण्यासाठी वापरला जातो. तर धाप नावाचा खवा गुलाबजाम करण्यासाठी वापरला जातो. खव्याचा भाव साधारणत: प्रतीनुसार २५० ते ५०० रुपये किलो आहे. एक लिटर दूध आटवले की, साधारणत: २०० ते २५० ग्रॅम खवा मिळतो. या हिशोबाने गोठ्यातले चांगले दूध ६० रुपये लिटर भावाचे धरले तर एक किलो खव्यासाठी ४ ते ५ लिटर दूध लागते. परंतु अनेक व्यापारी अशा पिवर खव्यात २० ते ३० टक्के भेसळ करतात आणि किलोमागे अधिक नफा मिळवू पाहतात. जो खवा सामान्य पेढे निर्मितीसाठी वापरला जातो त्यात ४० ते ५० टक्के भेसळ होऊ शकते. ही भेसळ ओळखण्यासाठी एफडीएने अत्यंत सोप्या अशा पद्धती शोधून काढल्या आहेत. खव्यावर आयोडीनचे काही थेंब टाकले आणि तो निळा पडला तर त्यात मैदा अथवा तांदळाच्या पिठाची भेसळ केलेली आहे, हे लगेच कळून येते. याशिवाय सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा वापर करूनही भेसळ ओळखता येते. अनेकदा मिठाई फॅन्सी करण्यासाठी तिला चांदीचा वर्ख लावला जातो. अनेकदा तो खाण्याच्या प्रतिचा नसतो. तसेच मिठाईतील रंगही अनेकदा दुय्यम दर्जाचे असतात. त्यामुळे ग्राहकांनी फॅन्सी मिठाई खरेदी न करता रंग आणि वर्ख याचा वापर नसलेली पारंपारिक मिठाई खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.