शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

बनावट खवा, मिठाईविरुद्ध एफडीएचे धाडसत्र

By admin | Updated: September 15, 2015 23:05 IST

गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने

ठाणे : गणेशोत्सव आणि गौरी सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचा महत्वपूर्ण घटक असलेल्या खव्यातील भेसळ व बनावट खवा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली असून धाडसत्रही सुरू केले आहे. गुजरातमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर खवा येतो. तसेच तो पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातूनही येतो. अनेकदा त्यात भेसळ असते. तसेच तो शिळा असतो. अशा खव्यात पूर्वी विषबाधा होण्याच्या घटना घडल्याने त्याविरुद्ध आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई एफडीएने सुरू केली आहे. शहा मणीलाल नरसी या फर्मवर धाड घातली असता शुद्ध पामतेलाच्या डब्यात तळणासाठी वापरून उरलेले खाद्यतेल भरलेले असल्याचे आढळून आले. तर कोपरखैरणे येथे मिठाईच्या दुकानावर धाड घातली असता काजूरोल या मिठाईत भेसळ केली असल्याचे आढळून आले. या दोन्ही धाडी शनिवारी घालण्यात आल्या. हे धाडसत्र अधिक व्यापक केले जाणार आहे. खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी उकडलेले बटाटे, रताळी, आरारुटची पावडर, तांदुळ आणि मैदा आदींचा वापर केला जातो. त्यातून अनेकदा विषबाधाही होऊ शकते. विशेषत: गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांच्या काळात खव्यातल्या भेसळील अधिक ऊत येतो. म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. खव्याचे एकूण पाच प्रकार असतात. त्यातला पहिला असतो बाटी या खव्यात मॉईश्चर कमी असते. दुसऱ्याला चिकना म्हणतात. त्यामध्ये ५० टक्के मॉईश्चर असते. त्याचा वापर फॅन्सी मिठाईसाठी होतो. तिसऱ्या प्रकाराला दाणेदार असे म्हणतात. त्याचा वापर कलाकन आणि विविध प्रकारच्या बर्फी तयार करण्यासाठी होतो. तसेच पिंडी नामक खवा पेढे तयार करण्यासाठी वापरला जातो. तर धाप नावाचा खवा गुलाबजाम करण्यासाठी वापरला जातो. खव्याचा भाव साधारणत: प्रतीनुसार २५० ते ५०० रुपये किलो आहे. एक लिटर दूध आटवले की, साधारणत: २०० ते २५० ग्रॅम खवा मिळतो. या हिशोबाने गोठ्यातले चांगले दूध ६० रुपये लिटर भावाचे धरले तर एक किलो खव्यासाठी ४ ते ५ लिटर दूध लागते. परंतु अनेक व्यापारी अशा पिवर खव्यात २० ते ३० टक्के भेसळ करतात आणि किलोमागे अधिक नफा मिळवू पाहतात. जो खवा सामान्य पेढे निर्मितीसाठी वापरला जातो त्यात ४० ते ५० टक्के भेसळ होऊ शकते. ही भेसळ ओळखण्यासाठी एफडीएने अत्यंत सोप्या अशा पद्धती शोधून काढल्या आहेत. खव्यावर आयोडीनचे काही थेंब टाकले आणि तो निळा पडला तर त्यात मैदा अथवा तांदळाच्या पिठाची भेसळ केलेली आहे, हे लगेच कळून येते. याशिवाय सल्फ्युरिक अ‍ॅसिडचा वापर करूनही भेसळ ओळखता येते. अनेकदा मिठाई फॅन्सी करण्यासाठी तिला चांदीचा वर्ख लावला जातो. अनेकदा तो खाण्याच्या प्रतिचा नसतो. तसेच मिठाईतील रंगही अनेकदा दुय्यम दर्जाचे असतात. त्यामुळे ग्राहकांनी फॅन्सी मिठाई खरेदी न करता रंग आणि वर्ख याचा वापर नसलेली पारंपारिक मिठाई खरेदी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.