शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By admin | Updated: August 15, 2015 22:42 IST

जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली

जव्हार : जव्हार तालुक्यातील आठ वर्षांपूर्वी खडखड धरण बांधण्यासाठी खडखड त्याच्या प्रकल्पग्रस्त आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आसरानगर हे नवे गाव घोषित केले. मात्र, आठ वर्षे उलटली असूनसुद्धा आजपावेतो तेथे वीजपुरवठा, रस्ते, पाण्याची सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या सुविधा मिळण्याकरिता अलताफ शेख व आसरानगर गाव समिती अध्यक्ष रवी लाखन यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या सर्व तालुक्यांचा महसूल तथा इतर सर्व विभागांच्या प्रशासकीय कामाचा कारभार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जव्हार येथूनच करावा. येथून नेलेली खाती परत जव्हारलाच सुरू करावी. डोमिहीरा (खडखड) धरण प्रकल्पबाधितांच्या आसरानगर या गावाला महसुली दर्जा देऊन तत्काळ वीजपुरवठा सुरू करून येथील आदिवासी जनतेला समाजमंदिर आणि स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. जव्हार एसटी स्टॅण्डच्या आवारात पत्र्यांच्या कम्पाउंडमधून अंबिका चौक, गांधी चौक, रिझवी मोहल्ला येथील वयोवृद्ध प्रवाशांकरिता येण्याजाण्यासाठी ५ फुटांचा रस्ता मोकळा करावा. जमीन घोटाळा करून जनतेची व प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या भूमाफिया, तलाठी, दुय्यम निबंधक यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, आदींसाठी हे उपोषण आहे असे सांगितले. (वार्ताहर)