शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

वसईतील शेतकऱ्यांची सुगी

By admin | Updated: November 9, 2016 03:35 IST

भाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत.

सुनील घरत,  पारोळभाताच्या कापण्या दिवाळीमुळे मंदावल्या होत्या. परंतु भाऊबीज संपल्याबरोबर वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून पुन्हा जोमाने त्या सुरु केल्या आहेत. येथील मजूर १५ दिवसांनी वीट भट्टी, बांधकामव्यवसाय, वसई पश्चिमेतील वाड्या, सागरी भागात मासेमारी करण्यासाठी जात असल्याने पुढील दोन आठवड्यात कापण्या पार पडल्या पाहिजेत. नाहीतर मजूर टंचाई निर्माण होईल म्हणून कापण्या सुरू केल्याचे शेतकरी सांगत आहेत. चालू वर्षी निसर्गराजाने बळीराजाला योग्य साथ दिल्याने चांगले पीक हाती लागले आहे. यामुळे येथील बळीराजा जोमाने कामाला लागला आहे . कापणी करून भारे बांधणी झालेले पीक खळ्याच्या सभोवताली उडवी रचून ठेवण्यात येत असून एक खळे साधारणत: तीन ते चार शेतकरी मिळून करत आहेत. यामुळे झोडणी पर्यंत पिकाचे संरक्षण सांघिक पद्धतीने करता येते. यातून येथील शेतकऱ्यांमध्ये सांघिक भावना रुजत असून पुढे काळाची गरज बनलेल्या सांघिक शेतीसाठी योग्य वातावरण ग्रामीण भागात तयार होत असल्याचे कृषी सहाय्यक अधिकारी अनिल मोरे यांनी सांगितले. यासाठी या भागातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्नही सुरु झाले असून खानिवडे येथे शेतकऱ्यांचा एक गट बनवण्यात आला आहे .