शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ससेहोलपट

By admin | Updated: February 18, 2017 04:56 IST

डहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप

अनिरुद्ध पाटील / बोर्डीडहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप केले जाते. मीटिंग आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी अधिकारी पार पाडत असल्याने अनेकदा या दिवशी ही शेतकऱ्यांना रिकामी हाताने परतावे लागते. त्यामुळे बे भरवशी पावसाप्रमाणे या विभागाची स्थिती झाल्याची टीका संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवीन जिल्हा निर्मिती नंतरही कार्यक्षम प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. डहाणू पंचायत समितीच्या कृषी विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. कृषी तसेच विस्तार अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे व लेखनिक आणि शिपायाचे पदही रिक्त आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरूवारी कृषी साहित्याचे वाटप केले जाते. नोंदणी तसेच वाटपाचे कार्य विस्तार अधिकारी करीत असून उर्वरित दिवशी त्यांना अन्य ग्रामपंचायतींमध्ये जाऊन प्रशासकांची भूमिकाही वठवावी लागते. हा तालुका हा आदिवासी बहुल असून कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर अशा समस्यांनी ग्रस्त आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला असून कृषी क्षेत्रसंबंधीत विविध योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचा गाजावाजा केला गेला. मात्र दिल्ली आणि गल्लीतील वास्तव भिन्न आहे. येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे सोयरेसुतक नाही. बांधकामाचा विकास निधी मंजूर करून तो पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून गटातटाचे राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ भारत व शौचालयांचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जुंपलेले आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय लाभापासून वंचित असून देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. लोकसंख्या ४ लाख अनेक पदे रिक्तडहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत ८५ ग्रामपंचायतीत १७४ गावं सामावलेली असून सुमारे चारलक्ष लोकसंख्या आहे. तालुक्याच्या आदर्श आराखड्यानुसार ९६३ हेक्टर क्षेत्र असून सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी आहे. खरीप हंगामात १५०० हेक्टरवर एकूण भात लागवड केली जाते. त्या पैकी हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० क्षेत्र आहे. रब्बी हंगामात हरभरा ९३ हेक्टर, वाल ८० हेक्टर, भाजीपाला ७५० हेक्टर, फळझाडे १२८४५ हेक्टर क्षेत्रावर आहे.मात्र शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाशी निगडीत योजनांचा लाभ सुलभरित्या घेता येत नाही. त्यामुळे शेती अवजारे, कीटकनाशके व औषधांकरिता खाजगी दुकानात अधिक पैसे मोजावे लागतात. मागील पाच-सहा वर्षात या हंगामात मिरची लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले असून स्थानिकांचा कल शेतीकडे वळल्याने सकारात्मक चित्र आहे.