शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शेतकऱ्यांची ससेहोलपट

By admin | Updated: February 18, 2017 04:56 IST

डहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप

अनिरुद्ध पाटील / बोर्डीडहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप केले जाते. मीटिंग आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी अधिकारी पार पाडत असल्याने अनेकदा या दिवशी ही शेतकऱ्यांना रिकामी हाताने परतावे लागते. त्यामुळे बे भरवशी पावसाप्रमाणे या विभागाची स्थिती झाल्याची टीका संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवीन जिल्हा निर्मिती नंतरही कार्यक्षम प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. डहाणू पंचायत समितीच्या कृषी विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. कृषी तसेच विस्तार अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे व लेखनिक आणि शिपायाचे पदही रिक्त आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरूवारी कृषी साहित्याचे वाटप केले जाते. नोंदणी तसेच वाटपाचे कार्य विस्तार अधिकारी करीत असून उर्वरित दिवशी त्यांना अन्य ग्रामपंचायतींमध्ये जाऊन प्रशासकांची भूमिकाही वठवावी लागते. हा तालुका हा आदिवासी बहुल असून कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर अशा समस्यांनी ग्रस्त आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला असून कृषी क्षेत्रसंबंधीत विविध योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचा गाजावाजा केला गेला. मात्र दिल्ली आणि गल्लीतील वास्तव भिन्न आहे. येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे सोयरेसुतक नाही. बांधकामाचा विकास निधी मंजूर करून तो पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून गटातटाचे राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ भारत व शौचालयांचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जुंपलेले आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय लाभापासून वंचित असून देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. लोकसंख्या ४ लाख अनेक पदे रिक्तडहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत ८५ ग्रामपंचायतीत १७४ गावं सामावलेली असून सुमारे चारलक्ष लोकसंख्या आहे. तालुक्याच्या आदर्श आराखड्यानुसार ९६३ हेक्टर क्षेत्र असून सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी आहे. खरीप हंगामात १५०० हेक्टरवर एकूण भात लागवड केली जाते. त्या पैकी हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० क्षेत्र आहे. रब्बी हंगामात हरभरा ९३ हेक्टर, वाल ८० हेक्टर, भाजीपाला ७५० हेक्टर, फळझाडे १२८४५ हेक्टर क्षेत्रावर आहे.मात्र शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाशी निगडीत योजनांचा लाभ सुलभरित्या घेता येत नाही. त्यामुळे शेती अवजारे, कीटकनाशके व औषधांकरिता खाजगी दुकानात अधिक पैसे मोजावे लागतात. मागील पाच-सहा वर्षात या हंगामात मिरची लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले असून स्थानिकांचा कल शेतीकडे वळल्याने सकारात्मक चित्र आहे.