शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:09 IST

राजेश पाटील : पारंपरिक शेतीमध्ये बदल व्हायला हवा

वसई : पालघर जिल्हा कृषीप्रधान आहे, मात्र येथील बेभरवशाच्या हवामानामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीवर्ग हा शेती व्यवसायापासून दुरावत चालला आहे. शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीमध्ये व्यावसायिक बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले, तर शेती व्यवसायामध्ये प्रचंड उदासीनता निर्माण झाली असल्याची खंत आ. राजेश पाटील यांनी बोलून दाखवली. ही उदासीनता दूर करून व्यावसायिक शेतीसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी बोईसरचे बविआचे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कुस्मो ॲग्रो (मुंबई) आणि वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित पालघर जिल्ह्यात प्रथमच व्यावसायिक दृष्टीने उसाचे क्लस्टर उभे केले आहे.

शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्या अर्थाने आर्थिक सुलभता येऊन यशस्वी झाले पाहिजे, यासाठी आता आ. राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून ऊसलागवडीचा शुभारंभ पालघर तालुक्यातील सातिवली येथील अंकुश देसले यांच्या शेतावर पार पडला. या कार्यक्रमाला वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि.चे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विनायक काशीद, संचालक कुस्मो ॲग्रो (आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक), डॉ कृष्णा परब, निर्यातदार आणि सारंग नेरकर, कृषी तंत्रज्ञ हे प्रमुख मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे