शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास महामंडळाकडून भातखरेदीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:27 IST

कर्जाचा विळखा वाढण्याची भीती : महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांची भातखरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना भाताची रक्कम  आजतागायत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून व इतर बँकांकडून कर्ज घेऊन भातशेती केली. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत केला तर शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली जाते. परंतु या मुदतीत महामंडळाकडून पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत नसल्याने येथील बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी तालुक्यातील देवघर येथील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ, वाड्याचे तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनाही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यात नऊ ठिकाणी भात खरेदी-विक्री केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या भाताचे संकलन करण्यात आले होते. या सर्व केंद्रांत १६ कोटी २८ लाख १३ हजार ४२२ रुपये इतक्या रकमेच्या भाताची खरेदी झालेली आहे. भातखरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना भातविक्रीची पावती देऊन नंतर त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे महामंडळाकडून जमा केले जातात. या वर्षी मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी भातविक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

कर्जाची परतफेड करणार कशी?

शेतकऱ्यांनी बँकांमध्ये खेटे मारूनही त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते. बँकेत पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागतात, परंतु हे अधिकारी कार्यालयात भेटत नाहीत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर तो उचलला जात नाही, अशाही तक्रारी शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे  ३१ मार्चअखेरीस बँकेच्या कर्जाची परतफेड करणार तरी कशी? या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.