शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

आदिवासी विकास महामंडळाकडून भातखरेदीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:27 IST

कर्जाचा विळखा वाढण्याची भीती : महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांची भातखरेदी आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना भाताची रक्कम  आजतागायत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून व इतर बँकांकडून कर्ज घेऊन भातशेती केली. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत केला तर शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली जाते. परंतु या मुदतीत महामंडळाकडून पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत नसल्याने येथील बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी तालुक्यातील देवघर येथील प्रयोगशील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ, वाड्याचे तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनाही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यात नऊ ठिकाणी भात खरेदी-विक्री केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या भाताचे संकलन करण्यात आले होते. या सर्व केंद्रांत १६ कोटी २८ लाख १३ हजार ४२२ रुपये इतक्या रकमेच्या भाताची खरेदी झालेली आहे. भातखरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना भातविक्रीची पावती देऊन नंतर त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे महामंडळाकडून जमा केले जातात. या वर्षी मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी भातविक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

कर्जाची परतफेड करणार कशी?

शेतकऱ्यांनी बँकांमध्ये खेटे मारूनही त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागते. बँकेत पैसे जमा झाले नसल्याने शेतकरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागतात, परंतु हे अधिकारी कार्यालयात भेटत नाहीत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर तो उचलला जात नाही, अशाही तक्रारी शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे  ३१ मार्चअखेरीस बँकेच्या कर्जाची परतफेड करणार तरी कशी? या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.