शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ऑनलाइन शिक्षण प्रणालीआधी आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा द्या; श्रमजीवीचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:57 IST

मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रथम हवी

पालघर : आॅनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्याआधी आदिवासीबहुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रथम उपलब्ध करून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत पालघर, रायगड आणि नाशिक आदी जिल्ह्यांतील सर्व पंचायत समिती कार्यालयांसमोर सत्याग्रह करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने आॅनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली आहे. या प्रणालीचा अभिनव सत्याग्रह करत श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी समाचार घेतला आहे. हस्तिदंत मनोºयात बसून शिक्षणमंत्र्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा घेतलेला निर्णय आणि आखलेले धोरण हे अत्यंत विद्वत्तापूर्ण असल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले.दुर्गम, ग्रामीण, आदिवासी भागात इंटरनेटची नेटवर्क सुविधा, प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन तात्काळ उपलब्ध करून द्यावा, ज्या दुर्गम भागात वीज नाही तेथे विजेची उपलब्धता निर्माण करून द्यावी, प्रत्येक आदिवासी व गरीब विद्यार्थ्याला इंटरनेट डेटा रिचार्जसाठी निधी द्यावा, वरील शैक्षणिक साहित्य व साधने उपलब्ध न झाल्यास ठाणे, पालघर, नाशिक व रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षण देण्याची व्यवस्था करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युलता पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्याग्रह झाला.