शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बोगस भरती रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:28 IST

जि.प.चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अटकेत : आणखी मोठे मासे गळाला लागणार?

हितेन नाईक

पालघर : बोगस शासन निर्णयाच्या आधारे ८० शिपायांची भरती करणाऱ्या अधिकारी आणि दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा रायगडचे जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी व त्यांच्या सहकाºयाला पालघरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करीत सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचे अवर सचिव भरत पाटील यांनी आपल्या सहीनिशी बनविलेल्या बोगस शासन निर्णयाचा आधार घेत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ८० शिपायांना (परिचर) पालघर जिल्हा परिषदेत सामावून घेत बोगस नोकºया दिल्या होत्या. केंद्र शासनामार्फत २००९-१० या वर्षांपासून राज्यात अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक स्तर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अपंग समावेशित शिक्षण योजना ही योजना नव्याने राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यामुळे अगोदरची अपंग एकात्मिक शिक्षण योजना १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आली. यानुसार बंद झालेल्या योजनेमुळे या योजनेतील कार्यरत विशेष शिक्षक व परिचर यांचे १५ सप्टेंबर २०१० च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये समायोजन करण्याचा आधार घेऊन पालघरच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकरी निधी चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र लिहून त्याद्वारे पालघरमध्ये रिक्त असलेली २११ पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीवरील शिपाई कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यात सामावून घेण्याची तयारी दर्शविली होती. या समायोजनेला पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी आक्षेप नोंदवीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवीत चौकशीची मागणी केली होती.परिचर नियुक्ती : एकूण ८८ आरोपीच्या प्रकरणातील आरोपी सखाराम मोते यांच्या घराच्या झडतीत मंत्रालयातील अवर सचिव, ग्रामविकास विभागाच्या भरत पाटील यांच्या सहीनिशी २७ नोव्हेंबर २०१७ अन्वये बोगस शासन निर्णय मिळून आला होता. हे खोटे अनधिकृत व बनावट पत्राचा आधार घेऊन जिल्हा परिषदमध्ये ८० परिचरांच्या नियुक्त्यांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता.च्तत्कालीन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, वरिष्ठ सहाय्यक रमेश पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद कहू यांनी काही वरिष्ठ अधिकाºयांच्या आशीर्वादानेच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, असा आरोप आहे. या परिचर नियुक्ती घोटाळ्यात८० परिचरपदी नियुक्त कर्मचाºयासह अन्य ८ असे एकूण ८८ आरोपी आहेत.भरत पाटील यांच्याभोवतीचा फास आवळला? : प्रकाश देवऋषी यांना १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमधून अटक केली होती. त्यामुळे या अवर सचिव भरत पाटील यांच्याभोवतालचा फास आवळला गेला असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश असून परिचर आणि अनुकंपा भरतीतील सर्व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार