शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

बोगस भरती रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:28 IST

जि.प.चे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अटकेत : आणखी मोठे मासे गळाला लागणार?

हितेन नाईक

पालघर : बोगस शासन निर्णयाच्या आधारे ८० शिपायांची भरती करणाऱ्या अधिकारी आणि दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. या प्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा रायगडचे जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी व त्यांच्या सहकाºयाला पालघरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करीत सोमवारी पालघर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचे अवर सचिव भरत पाटील यांनी आपल्या सहीनिशी बनविलेल्या बोगस शासन निर्णयाचा आधार घेत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील ८० शिपायांना (परिचर) पालघर जिल्हा परिषदेत सामावून घेत बोगस नोकºया दिल्या होत्या. केंद्र शासनामार्फत २००९-१० या वर्षांपासून राज्यात अपंग एकात्मिक शिक्षण योजना माध्यमिक स्तर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अपंग समावेशित शिक्षण योजना ही योजना नव्याने राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यामुळे अगोदरची अपंग एकात्मिक शिक्षण योजना १ मार्च २००९ पासून बंद करण्यात आली. यानुसार बंद झालेल्या योजनेमुळे या योजनेतील कार्यरत विशेष शिक्षक व परिचर यांचे १५ सप्टेंबर २०१० च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये समायोजन करण्याचा आधार घेऊन पालघरच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकरी निधी चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र लिहून त्याद्वारे पालघरमध्ये रिक्त असलेली २११ पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीवरील शिपाई कर्मचाऱ्यांना पालघर जिल्ह्यात सामावून घेण्याची तयारी दर्शविली होती. या समायोजनेला पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी आक्षेप नोंदवीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवीत चौकशीची मागणी केली होती.परिचर नियुक्ती : एकूण ८८ आरोपीच्या प्रकरणातील आरोपी सखाराम मोते यांच्या घराच्या झडतीत मंत्रालयातील अवर सचिव, ग्रामविकास विभागाच्या भरत पाटील यांच्या सहीनिशी २७ नोव्हेंबर २०१७ अन्वये बोगस शासन निर्णय मिळून आला होता. हे खोटे अनधिकृत व बनावट पत्राचा आधार घेऊन जिल्हा परिषदमध्ये ८० परिचरांच्या नियुक्त्यांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता.च्तत्कालीन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, वरिष्ठ सहाय्यक रमेश पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद कहू यांनी काही वरिष्ठ अधिकाºयांच्या आशीर्वादानेच या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, असा आरोप आहे. या परिचर नियुक्ती घोटाळ्यात८० परिचरपदी नियुक्त कर्मचाºयासह अन्य ८ असे एकूण ८८ आरोपी आहेत.भरत पाटील यांच्याभोवतीचा फास आवळला? : प्रकाश देवऋषी यांना १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमधून अटक केली होती. त्यामुळे या अवर सचिव भरत पाटील यांच्याभोवतालचा फास आवळला गेला असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश असून परिचर आणि अनुकंपा भरतीतील सर्व दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार