शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दररोज शेकडो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:24 IST

आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला गळती : ठेकेदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष

आशिष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ‘एच’ प्रभागाअंतर्गत नवघर-माणिकपूर शहरातील आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावातून काही दिवसांपासून पाणी गळती होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, या तलावावर नियंत्रण ठेवणारे ठेकेदार, व्यवस्थापक तथा पालिकेतील अधिकारी वर्गही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे या गळतीमुळे इथे दररोज शेकडो ली. पाणी वाहून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वसई - विरार महापालिका नवघर - माणिकपूर विभागीय ‘एच’ प्रभागांतर्गत ओमनगर परिसरात पालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर हा सेमी आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. येथे सकाळी तसेच संध्याकाळी मुले - मुली, तरुण पोहण्यासाठी येतात. दरम्यान, मधल्या काळात एप्रिल महिन्यात या तलावात बुडून एक आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.तेव्हापासून हा तलाव बरेच महिने पोहण्यासाठी बंद करण्यात आला होता. आता दोनच महिन्यांपूर्वीच पोहण्यासाठी हा तलाव पुन्हा खुला करण्यात आला आहे.मात्र, दरम्यानच्या काळात या तलावाच्या देखभाल - दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाला गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे येथे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी तलावाला गळती लागली आहे, त्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी येथील व्यवस्थापकांकडे केली होती. तरीही याची दुरुस्ती न झाल्याचा आरोप राज दसोनी यांनी केला असून दुरुस्तीअभावी अद्यापही पुलामधून दररोज शेकडो ली. पाणी वाया जात आहे.याबाबतची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे. तसेच, या तलावासाठी पालिका लाखो रुपयांचा खर्च करत असूनही या तलावाची योग्य ती निगा राखली जात नाही. हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असून पालिकेने त्वरित ही गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.नेमकी गळती कुठून होते?प्रशासकीय पातळीवर हा विषय बांधकाम खात्याकडे येतो. मात्र, बांधकाम खाते पाणी विभागाकडे बोट करते. त्यांना तपासणी करायला लावते. पाणी खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जलतरण तलावाला जोडलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या तसेच त्यांचे फिल्टर तपासले असून नेमकी गळती कुठून होत आहे हेच समोर येत नाही. त्यामुळे बांधकाम खाते आणि ज्यांनी कोणी त्या वेळी काम केले आहे, त्यांनी योग्यरीत्या तपास करणे महत्त्वाचे असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला मिळाली आहे.मला या प्रकाराची माहिती आताच मिळत असून आपण सांगता आहात त्याप्रमाणे दररोज हजारो ली. पाणी वाया जात असेल तर ही बाब गंभीर आहे. मी ताबडतोब या जलतरण तलाव गळतीच्या प्रकरणात जातीने लक्ष टाकून ते काम करून घेतो.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई - विरार शहर महानगरपालिकामाझ्याकडे याबाबत दोन - तीन तक्रारी आल्या असून पाणी विभागाच्या कर्मचाºयांकडून लवकरच याची पाहणी करतो. ज्यांनी हे काम केले आहे, त्यांनाही बोलावून घेतो.- प्रकाश साटम, बांधकाम उपअभियंता, एच प्रभाग समिती