शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दररोज शेकडो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:24 IST

आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावाला गळती : ठेकेदारासह प्रशासनाचे दुर्लक्ष

आशिष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ‘एच’ प्रभागाअंतर्गत नवघर-माणिकपूर शहरातील आॅलिम्पिक दर्जाच्या जलतरण तलावातून काही दिवसांपासून पाणी गळती होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, या तलावावर नियंत्रण ठेवणारे ठेकेदार, व्यवस्थापक तथा पालिकेतील अधिकारी वर्गही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे या गळतीमुळे इथे दररोज शेकडो ली. पाणी वाहून वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वसई - विरार महापालिका नवघर - माणिकपूर विभागीय ‘एच’ प्रभागांतर्गत ओमनगर परिसरात पालिकेतर्फे २५ बाय १५ मीटर हा सेमी आॅलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. येथे सकाळी तसेच संध्याकाळी मुले - मुली, तरुण पोहण्यासाठी येतात. दरम्यान, मधल्या काळात एप्रिल महिन्यात या तलावात बुडून एक आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.तेव्हापासून हा तलाव बरेच महिने पोहण्यासाठी बंद करण्यात आला होता. आता दोनच महिन्यांपूर्वीच पोहण्यासाठी हा तलाव पुन्हा खुला करण्यात आला आहे.मात्र, दरम्यानच्या काळात या तलावाच्या देखभाल - दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तलावाला गळती लागून यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे येथे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे ज्या ठिकाणी तलावाला गळती लागली आहे, त्या भागाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी येथील व्यवस्थापकांकडे केली होती. तरीही याची दुरुस्ती न झाल्याचा आरोप राज दसोनी यांनी केला असून दुरुस्तीअभावी अद्यापही पुलामधून दररोज शेकडो ली. पाणी वाया जात आहे.याबाबतची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे. तसेच, या तलावासाठी पालिका लाखो रुपयांचा खर्च करत असूनही या तलावाची योग्य ती निगा राखली जात नाही. हा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असून पालिकेने त्वरित ही गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.नेमकी गळती कुठून होते?प्रशासकीय पातळीवर हा विषय बांधकाम खात्याकडे येतो. मात्र, बांधकाम खाते पाणी विभागाकडे बोट करते. त्यांना तपासणी करायला लावते. पाणी खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी जलतरण तलावाला जोडलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या तसेच त्यांचे फिल्टर तपासले असून नेमकी गळती कुठून होत आहे हेच समोर येत नाही. त्यामुळे बांधकाम खाते आणि ज्यांनी कोणी त्या वेळी काम केले आहे, त्यांनी योग्यरीत्या तपास करणे महत्त्वाचे असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला मिळाली आहे.मला या प्रकाराची माहिती आताच मिळत असून आपण सांगता आहात त्याप्रमाणे दररोज हजारो ली. पाणी वाया जात असेल तर ही बाब गंभीर आहे. मी ताबडतोब या जलतरण तलाव गळतीच्या प्रकरणात जातीने लक्ष टाकून ते काम करून घेतो.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई - विरार शहर महानगरपालिकामाझ्याकडे याबाबत दोन - तीन तक्रारी आल्या असून पाणी विभागाच्या कर्मचाºयांकडून लवकरच याची पाहणी करतो. ज्यांनी हे काम केले आहे, त्यांनाही बोलावून घेतो.- प्रकाश साटम, बांधकाम उपअभियंता, एच प्रभाग समिती