शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

६९ वर्षांत साधा बल्बही पेटला नाही

By admin | Updated: August 25, 2015 22:44 IST

डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही.

- शशिकांत ठाकूर,  कासाडहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही. यासंदर्भात महावितरणला अर्ज, विनंत्याही झाल्या, मात्र या भागाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.डहाणू तालुक्यातील ओसरवीरा, सुकटआंबा, चळणी, किन्हवली, दिवशी, दाभाडी, सोनाळे, खानीव, सायवन आदी गावांसह काही पाडे अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विजेवर चालणारे टीव्ही, फ्रीज, फॅन, संगणक, शेगडी आदी उपकरणे वापराचे सुख तर जाऊ द्या, पण रात्रीच्या वेळी अंधार दूर करण्यासाठीचे भाग्यही या जनतेच्या नशिबी नाही.ओसरवीरा येथील लाइमपाडा, शिंगाडपाडा, लाखानपाडा, डोंगरीपाडा या पाड्यांना अद्याप वीज नाही. वीज मिळण्यासाठी या गावांतील नागरिकांनी ४ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत वीज महामंडळ अधिकाऱ्यांकडे प्रस्तावही दिला होता. त्यानंतर, पाड्यांचा सर्व्हेही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप विजेचा ठावठिकाणा नाही. येथील माजी पंचायत समिती सदस्य काशिराम रसाळ यांनी ओसरवीरातील चार पाड्यांवर अद्यापही विजेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी मोठी गैरसोय होते, असे लोकमतला सांगितले.लालफितीमुळे गैरमार्गाचा वापरया लालफितीच्या कारभारामुळे नागरिकांनी ज्या पाड्यांना विजेची सुविधा आहे, तेथून लाकडी खांब गाडून उघड्या तारा खेचून दुसऱ्याच्या मीटरमधून वीज नेली आहे. अशा गैरमार्गाने वीज नेल्याने धोकाही संभवतो. तर, काही नागरिक मात्र अंतर खूप असल्याने अंधारातच राहतात. दरम्यान, गावातील नागरिकांनी वारंवार अर्ज, विनंत्या करूनही अद्याप विजेची सुविधा न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. काही गावपाड्यांवर विजेचे खांबही उभे केले, मात्र अद्याप वीजवाहक तारा खेचलेल्या नाहीत.