शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणही ‘कुपोषित’

By admin | Updated: July 23, 2015 04:09 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागातील आश्रमशाळा तसेच निवासी शासकीय वसतिगृहांत राहून चांगले शिक्षण घेता यावे व त्यांना

शौकत शेख, डहाणूआदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागातील आश्रमशाळा तसेच निवासी शासकीय वसतिगृहांत राहून चांगले शिक्षण घेता यावे व त्यांना दर्जेदार सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने नवीन इमारती बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. परंतु, शासनाच्या उदात्त हेतूला मूठमाती देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आदिवासी विकास प्रशासनाकडून होत आहे. या दुर्लक्षित कारभारामुळे डहाणू, तलासरी, पालघर, वसई या भागांतील आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहांची विदारक परिस्थिती आहे. येथे गेल्या पाच वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने येथील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर तसेच वसई भागातील शासकीय आश्रमशाळा, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांतून दरवर्षी हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. पुढील शिक्षणासाठी ते वरील तालुक्यांतील आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहात अर्जही करीत असत. परंतु, वर्षानुवर्षांपासून बहुसंख्य भाड्याच्या इमारतीत असलेल्या आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची मर्यादित संख्या व क्षमता वाढत नसल्याने हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बहुसंख्य आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत असल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांची इमारत आदिवासी विकास विभागाच्या मालकीची व्हावी म्हणून पाच वर्षांपूर्वी १४ आश्रमशाळांच्या इमारती बांधकामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यात वर्ग केला आहे. परंतु, चार तालुक्यांत केवळ आठ आश्रमशाळांच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तर २२ आश्रमशाळांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी १५ लाख जमा केले आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन-चार वर्षांत एकही आश्रमशाळेची इमारत तयार झालेली नाही. परिणामी, आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृह चालत असलेल्या भाड्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या, पडक्या खोल्यांमध्ये रहावे लागते.