शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

मिरचीचे अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:04 IST

हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.

अनिरु द्ध पाटील बोर्डी : हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.मागील चार-पाच वर्षांपूर्वी मिरचीला चांगला दर मिळाला होता. तथापि डहाणू आणि तलासरी तालुक्यात या पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. मात्र या हंगामात डिसेंबर महिन्यात ओखी वादळाने पाऊस आणि हवामानात बदल झाला. जमिनीतील ओलावा आणि त्यानंतर दोन-तीन महिने थंडी असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारांसह पाऊस पडला. त्या वेळीही बदललेल्या हवामानाचा फटका बसून पिकावर दुष्परिणाम झाला. आगामी काळात चांगला दर मिळेल या आशेने शेतकºयांनी पैसा खर्च करून कीटकनाशक फवारणी केली. मात्र दीड मिहन्यापूर्वी फक्त तीन-चार दिवसच प्रति किलो ५० रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर या हंगामात मिरचीने भाव खाल्लाच नसल्याची व्यथा शेतकºयांनी मांडली. शिवाय लागवड केलेल्या काही जातीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त निघाल्याने या रोपांची अपेक्षित वाढ झालीच नाही. त्यामुळे वैतागलेल्या बळीराजाने ऐन उत्पादनाच्या काळात पिकांना पाणी देण्याचे सोडून देत, काळजावर नांगर फिरवला. ज्या जाती तगधरून राहिल्या त्यांना मिळणारा भाव खूपच कमी असून त्याच्या तोडणी करीता लागणारे मजुरीचे पैसेही भरून निघणे मुश्किल झाले आहे. शिवाय उन्हाच्या तडाख्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून फलगळतीसह त्याचा आकार व रंग यावर परिणाम दिसून येत आहे. ही सबब पुढे करून व्यापारी चांगला दर द्यायला तयार नाही. दरम्यान या पिकाकरीता गुंतवलेला पैसाही वसूल झालेला नसून मिरची उत्पादक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.