शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाड्यातील डम्पिंगचे चेंडू सेनेच्याच कोर्टात, सत्ताधारीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:18 IST

वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गंधीची जबाबदारी सत्ताधाºयांकडेच जाते.

- वसंत भोईरवाडा  - वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गंधीची जबाबदारी सत्ताधाºयांकडेच जाते.येथील नगरपंचायतीला डिम्पंग ग्राऊंड नसल्याने सध्या एका खासगी जागेत संपुर्ण शहराच्या कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. हा कचरा भिवंडी-वाडा महामार्गाच्या कडेला टाकला जात असल्याने प्रवाशांना दुर्गंधीने त्रस्त केले आहे. रोजच्या ढीगभर कचºयाचा निचरा करायचा तरी कसा असा प्रश्न नगरपंचायत प्रशासनाला पडला आहे.पुर्वीची ग्रामपंचायत व आताची नगरपंचायतीमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना सत्तेत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा येथील स्थानिक असतानाही या महत्वाच्या समस्येला तात्पुरता पर्याय देण्या खेरीज कुणीही कायमचा उपाय करू शकला नाही हे दुर्दैव आहे. मात्र, ही जबाबदारी तत्कालिन ग्रामपंचायत व सध्याच्या नगरपंचायतीची असल्याने दुर्गंधीचा हा चेंडू शिवसेनेच्याच कोर्टात पडलेला आहे.नगरपंचायत सध्या उमरोठे रोड या भागात नवीन जागा भाड्याने घेण्याच्या तयारीत आहे मात्र, वनविभाग किंवा अन्य सरकारी जागा कायमस्वरूपी मिळविण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागतो तो अद्याप तरी झालेला दिसत नाही यावरून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने फक्त नावात बदल झाला बाकी जैसे थे आहे असेच दिसत आहे.वाडा ग्रामपंचायत भाड्याने जागा घेऊन पूर्वी सिद्धेश्वरीरोड येथे कचरा टाकला जायचा व त्यानंतर हा डेपो आता वाडा भिवंडी महामार्गावर गांधरे गावाजवळ आहे. शहरातील घनकचरा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे अनेकदा महामार्ग अर्धा झाकला जातो तर, सुका कचरा पेटविल्याने धुराचे लोट वाहनांना अडथळा आणतात. या कचºयातील खाद्य पदार्थ खाण्यासाठी मोकाट गुरे व कुत्री गर्दी करीत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. खरंतर प्रत्येक निवडणूकीतील हा सर्वात महत्वाचा मुद्या असला तरी सेनेने त्यास मोठ्या खूबीने बगल दिली आहे.सफाई कर्मचारी वाºयावर-वाडा शहरातून सध्या दररोज६ मॅजिक घंटा गाड्या व ७ट्रॅक्टर इतका कचरा बाहेर निघतो. ज्यासाठी २ मॅजिक गाड्या तर दोन ट्रॅक्टर कार्यरत असतात.- कचरा व्यवस्थापनासाठी नगरपंचयातीकडे २४ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे आरोग्य सुरक्षेसाठी कोणतेही पोशाख नाहीत. किं वा प्रदुषण सुरक्षेची उपाय योजना नाही.एका महिन्यात समस्या सुटेल - नगराध्यक्षनवीन जागे साठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार करून जागेच्या भाड्या विषयी चर्चा सुरू आहे. कुणालाही त्रास होणार नाही अशा नवीन जागेत हे डम्पिंग ग्राउंड येत्या महिना भरात स्थलांतरित होईल अशी माहिती वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या