शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

डोळखांब भागातील गांडूळवाड गावात भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:39 IST

धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसहीत धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

- वसंत पानसरेकिन्हवली - धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसहीत धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागतो आहे. डोळखांब - कसारा या मुख्य रस्त्यावरून २ किमी. दुर्गम भागात असलेल्या तळवडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गांडूळवाड या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३५ घरांची वस्ती, १२०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाला पाणी समस्या भेडसावते आहे. २९ तारखेला झालेल्या गाव यात्रेलाही या टंचाईचा फटका बसला आहे.२००४ मध्ये जलस्वराज्य योजनेमधून १ कोटींच्या आसपास रक्कम असलेल्या नळयोजनेसाठी एक टाकी बांधण्यात आली. मुख्य रस्त्यापासून २ किमी. अंतरावर असलेल्या गावापर्यंत २२ लाखांचा खर्च करून या योजनेचे काम करण्यात आले. गांडुळवाड फाट्याजवळ असलेल्या परंतु योग्य नियोजन नसल्याने या टाकीत पाणीच चढले नाही. त्यामुळे ही नळयोजना बारगळली. डोळखांब धरणाच्या विहिरीतून गांडूळवाड येथील विहिरीत पाणी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही ही योजना अयशस्वीच ठरली. १२ दिवसांपूर्वी ही योजना पुन्हा सुरू करून पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही येथील विहिरीत पाणी पोहोचतच नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. येथील महिलांना कपडे धुण्यासाठी पुरुषांच्या मदतीने डोळखांब धरण किंवा चोर नदी येथे जावे लागते आहे. दरवर्षीच्या या समस्येने येथील महिला वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे.या ठिकाणी असलेल्या विहिरी आटल्याने, पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने येथील ग्रामस्थांना टँकरने आलेले पाणी पुरत नाही. परिणामी, ३ किमी. अंतरावरील एका खाजगी फार्महाऊसमधून आपली पाण्याची गरज भागवावी लागते आहे. पाणी योजनेचा उडालेला बोजवारा, टँकरचे अपुरे पाणी, आणि गावातील विहीरीमध्ये पाणी नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली.पाण्याअभावी गांडुळवाड येथील आदिवासींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील जनावरेही पाण्याअभावी मृत पावत आहेत. येथे असणाºया विहिरीच्या बाजूलाच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेसाठी एक बंधारा बांधला होता. त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.

पाणी नसल्याने शौचालय बंदपाण्याच्या भीषण टंचाईने येथे असलेले शौचालय बंद दिसून येते. पिण्यासाठीच पाणी नाही तर शौचालयाचा वापर कोण करणार असा सवाल येथील ग्रामस्थ करतात.आमच्या गावात टँकर येतो परंतु लोकसंख्या जास्त असल्याने दिवसाआड येणारा १ टँकर पुरत नाही. आम्हाला रात्री अंधारात पाणी भरावे लागते. तसेच कपडे धुण्यासाठी आम्हाला डोळखांब धरणावर चालत जावे लागते.- येमी गोमा हंबीर, महिला ग्रामस्थ, गांडूळवाड.

या गावातील नळपाणी पुरवठा योजनेचे १ लाख ३ हजार रुपयांचे बिल थकित असून महाराष्ट्र वीज वितरण कंपणीने मीटर काढून नेला आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाई जाणवू लागली. आमच्याविभागाकडून काही दिवस पाण्याचा टँकर पाठवत होतो. नुकताच विद्युत प्रवाह पूर्ववत केल्याने पाण्याची टंचाई लवकरच दूर होईल.- एम.आव्हाड, उपअभियंता पाणी पुरवठा, पं.स.शहापूर

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई