शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

उन्हाळी भातशेती पिके धोक्यात

By admin | Updated: February 15, 2017 23:26 IST

सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो

कासा : सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे संपूर्ण कालवाच गाळात रूतला अशी स्थिती असून उन्हाळी पिके धोक्यात सापडली आहेत. या कालव्यातून डहाणू, पालघर तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळी शेतीला पाणीपुरवठा के ला जातो. याच पाण्यावर शेतकरी उन्हाळयात प्रामुख्याने भातशेती करतात. तसेच भुईमूग व भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, गेल्या पाच वर्षापासून या कालव्यांची पूर्णपणे साफसफाई केली गेलेली नाही. तसेच, गाळही काढला गेलेला नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच लघु कालवेही गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तसेच मुख्यकालव्यांतून लघूकालव्यांना पाणी सोडणारे गेट ही गाळाने भरल्याने पाणी बंद झाले आहे. तर काही ठिकाणी गेट तुटल्याने पाणी वाया जाते. यामुळे शेवटच्या गावातील शेतांना अपुरा पाणीपुरवठा होतो. पेठ येथे वेळेवर पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांच्या भातरोपण्या आठवडाभर रखडल्या आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे शेतकरी रोपणीच्या वेळेस कालव्यांना मध्येच बांध टाकत असल्याने पुढील गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भातशेतीवर मोठा परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)