शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: October 31, 2015 22:30 IST

गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम

- दिपक मोहिते,  वसईगणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम सुरू झाली आहे. परंतु यंदा दिपावलीवरही मंदीचे सावट आहे. तर ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे भातपीकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे बळीराजामध्येही फारसा उत्साह नाही. गेला महिनाभर या उपप्रदेशातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे बागायती क्षेत्रावरही चांगलाच परिणाम जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या ग्रामीण भागात यंदा दसरा, नवरात्री साजरा करण्यासंदर्भात उत्साह नव्हता. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, त्याचा शेतीवर परिणाम व निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत गेले. पूर्वी वसईचा तांदुळ सर्वदूर विक्रीसाठी जात असे परंतु आता वर्षभर पुरेल इतकाच भात बळीराजाच्या हाती लागतो. शहरी भागामध्ये महागाईने उच्चांक गाठल्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कांदे व तुरडाळीने नागरीकांना अक्षरश: रडवले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर तुरडाळ व मुगाच्या डाळीने भाववाढीचा उच्चांक नोंदला आहे. कांदे आजही ५० ते ६० रू. किलो दराने विकले जातात तर यंदाच्या दिपावलीमध्ये मुगाच्या डाळीच्या चकल्या पहावयास मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून वसई विरार उपप्रदेशातील हवामानात प्रचंड फरक पडला असू त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर जाणवू लागला आहे. येथील ऋतुचक्र वारंवार का बदलले जाते याचा शोध घेण्याची गरज आहे.यंदा निसर्गाची साथ बळीराजाला न मिळाल्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी भात लागवडीऐवजी अन्य पीके घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने आपले सण साजरा करणारा आदिवासी समाजही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदास आहे. केवळ शेठजींच्या वाडीवर रोजगार मिळवून आदिवासी भूमीपुत्र आपले सण कसेबसे साजरे करीत आहेत.