शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: October 31, 2015 22:30 IST

गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम

- दिपक मोहिते,  वसईगणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम सुरू झाली आहे. परंतु यंदा दिपावलीवरही मंदीचे सावट आहे. तर ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे भातपीकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे बळीराजामध्येही फारसा उत्साह नाही. गेला महिनाभर या उपप्रदेशातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे बागायती क्षेत्रावरही चांगलाच परिणाम जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या ग्रामीण भागात यंदा दसरा, नवरात्री साजरा करण्यासंदर्भात उत्साह नव्हता. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, त्याचा शेतीवर परिणाम व निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत गेले. पूर्वी वसईचा तांदुळ सर्वदूर विक्रीसाठी जात असे परंतु आता वर्षभर पुरेल इतकाच भात बळीराजाच्या हाती लागतो. शहरी भागामध्ये महागाईने उच्चांक गाठल्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कांदे व तुरडाळीने नागरीकांना अक्षरश: रडवले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर तुरडाळ व मुगाच्या डाळीने भाववाढीचा उच्चांक नोंदला आहे. कांदे आजही ५० ते ६० रू. किलो दराने विकले जातात तर यंदाच्या दिपावलीमध्ये मुगाच्या डाळीच्या चकल्या पहावयास मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून वसई विरार उपप्रदेशातील हवामानात प्रचंड फरक पडला असू त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर जाणवू लागला आहे. येथील ऋतुचक्र वारंवार का बदलले जाते याचा शोध घेण्याची गरज आहे.यंदा निसर्गाची साथ बळीराजाला न मिळाल्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी भात लागवडीऐवजी अन्य पीके घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने आपले सण साजरा करणारा आदिवासी समाजही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदास आहे. केवळ शेठजींच्या वाडीवर रोजगार मिळवून आदिवासी भूमीपुत्र आपले सण कसेबसे साजरे करीत आहेत.