शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: October 31, 2015 22:30 IST

गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम

- दिपक मोहिते,  वसईगणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम सुरू झाली आहे. परंतु यंदा दिपावलीवरही मंदीचे सावट आहे. तर ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे भातपीकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे बळीराजामध्येही फारसा उत्साह नाही. गेला महिनाभर या उपप्रदेशातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे बागायती क्षेत्रावरही चांगलाच परिणाम जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या ग्रामीण भागात यंदा दसरा, नवरात्री साजरा करण्यासंदर्भात उत्साह नव्हता. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, त्याचा शेतीवर परिणाम व निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत गेले. पूर्वी वसईचा तांदुळ सर्वदूर विक्रीसाठी जात असे परंतु आता वर्षभर पुरेल इतकाच भात बळीराजाच्या हाती लागतो. शहरी भागामध्ये महागाईने उच्चांक गाठल्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कांदे व तुरडाळीने नागरीकांना अक्षरश: रडवले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर तुरडाळ व मुगाच्या डाळीने भाववाढीचा उच्चांक नोंदला आहे. कांदे आजही ५० ते ६० रू. किलो दराने विकले जातात तर यंदाच्या दिपावलीमध्ये मुगाच्या डाळीच्या चकल्या पहावयास मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून वसई विरार उपप्रदेशातील हवामानात प्रचंड फरक पडला असू त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर जाणवू लागला आहे. येथील ऋतुचक्र वारंवार का बदलले जाते याचा शोध घेण्याची गरज आहे.यंदा निसर्गाची साथ बळीराजाला न मिळाल्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी भात लागवडीऐवजी अन्य पीके घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने आपले सण साजरा करणारा आदिवासी समाजही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदास आहे. केवळ शेठजींच्या वाडीवर रोजगार मिळवून आदिवासी भूमीपुत्र आपले सण कसेबसे साजरे करीत आहेत.