शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कृषी विभागाचे बंधारे करोडो खर्चूनही कोरडेच

By admin | Updated: March 20, 2017 01:53 IST

भीषण पाणी टंचाईत होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राबविलेली महत्वकांक्षी

रवींद्र साळवे / मोखाडाभीषण पाणी टंचाईत होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राबविलेली महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना मोखाडा कृषी विभागाने बासनात गुंडाळली आहे.सन २०१६-१६ च्या दरम्यान मोखाडा कृषी विभागाने पोशेरा, खोच, उधळे, जोगलवाडी, किनिस्ते, कारेगाव, ब्राह्मणगाव, आसे, दांडवळ, धामणी, सूर्यमाळ, डोल्हारा अशा १४ गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या अंतर्गत ५ कोटी खर्च करून बांधलेले बंधारे निकृष्ट बांधकामामुळे कोरडे ठाक पडले आहेत. त्यात थेंबभरही पाणी साठत नाही. जोगलवाडी मोहिते कॉलेज जवळ कृषी विभागाने सन २०१५-१६ मध्ये १४ लाख रु पये खर्चून २८ मीटर लांबीचा सिमेंट बंधारा बांधला. परंतु निकृष्ट बांधकामामुळे त्यात आज एक थेंबही पाणी नाही. हे काम सुरु असतांना अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या तेव्हा हे काम थांबवले जाईल असे तालुका कृषी अधिकारी बी बी वाणी यांनी सांगितले होते परंतु याकडे त्यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आणि पहिल्याच पावसात या बंधाऱ्याला गळती लागली या निकृष्ट बंधाऱ्याचे वृत्तही लोकमतने प्रसिद्ध केले होते. यानंतर कृषिविभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी करण्यात समाधान मानले. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. इतर बंधाऱ्यांची अवस्था काही वेगळी नाही यामुळे बंधाऱ्यांवर झालेला करोडोचा खर्च अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांच्या घशात घातला का? असा संतप्त सवाल विचारला जात आहेपावसाचे पाणी शिवारात अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, गुराढोरांना प्यायला पाणी मिळावे, विकेंद्रित पाणी साठा निर्माण व्हावा असे उद्देश बाळगून जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सिमेंट बंधारे, मातीबंधारे, बंधाऱ्यांचे खोलीकरण अस्तित्वात असलेल्या परंतु निकामी झालेले बंधारे दुरूस्त करणे अशी विविध कामे केली गेली. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट बंधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. परंतु कृषी विभागाच्या आशीर्वादामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस कामे झाली. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना बासनात गुंडाळल्याचे चित्र निर्माण झाले. हे बंधारे कोरडे ठाक पडल्याने बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.