शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

धगडीपाडा उपकेंद्र गेली १० वर्षे खाते आहे धूळ !

By admin | Updated: February 16, 2016 02:20 IST

विक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धगडीपाडा येथील आदिवासी परिसर गाव-खेडयातील रुग्णांसाठी शासनाने सन- २००६-७ मध्ये उपक्रेंद्रांची इमारत बांधलेली आहे़

राहुल वाडेकर ,  तलवाडाविक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धगडीपाडा येथील आदिवासी परिसर गाव-खेडयातील रुग्णांसाठी शासनाने सन- २००६-७ मध्ये उपक्रेंद्रांची इमारत बांधलेली आहे़ परंतु ती गेल्या १० वर्षापासून धूळखात पडून आहे. तिच्या अवती भवती गवताचे जाळे पसरलेल असून या उपकेंद्रांचा बांधल्यापासून १० वर्षात येथील गरीब खेडयातील जनतेला कोणताही उपयोग झालेला नाही़ आजही या लोकांना गावात उपकेंद्र इमारत असतांनाही दोन किलो मीटर खडतर रस्ता पार करुन कुंर्झे येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे़ परंतु रात्री अतितातडीच्या रुग्णास हे धोकादायक असून जिवावर बेतणारे आहे़ याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामसभेत केंद्र सुरु करण्यासंदर्भात ठराव घेवुन त्याची प्रत,तक्रारी अर्ज संबंधीत विभागात दिलेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगत असून अदयापही यावर काहीच उपाय योजना झालेली नाही़ धगडीपाडयाची लोकसंख्या अंदाजीत ५०० ते ६०० च्या आसपास आहे. जवळच आश्रमाळा असुन त्यामध्ये जवळ जवळ ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ परंतु या पाडयात आरोग्याची तशी कोणतीच सुविधा नाही त्यामुळे त्यांना एकमेव कुंर्झे आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे़ तर कुंर्झे आरोग्य केंद्रांत अगोदरच कोणत्याही प्रकारच्या योग्य अशा सुविधा नाही. जवळच जंगल भाग असल्याने रोजच संर्पदंशाचे रुग्ण येत असतांत परंतु या आरोग्य केंद्रात कोणत्याही योग्य अशा सुविधा नसल्याने तसेच आजूबाजूच्या पाडयातील व शहरांशी संपर्क करणारे रस्ते हे खूप खराब असल्याने रुग्णउपचार घेण्याअगोदरच दगावण्याची शक्यता जास्त असते़ तसेच दुर्गम खेडया-पाडयात शासन दरबारी नोेंद नसलेली कुपोषित बालके येतात व त्यांचे मृत्यू होत असतांत खेडयातील लोक गरीब अज्ञानानी असल्याने अशा प्रकारांची नोंद सरकारी दप्तरी होत नाही. कित्येक लोक सर्पदंशाचे शिकार होत असतांत़ कुंर्झंै आरोग्य केंद्रांत महत्वाची पदे रिक्त आहेत़ त्यासाठी येथील ग्रमास्थांना आंदोलनही करावे लागले होते, तर येथील उपलब्ध कर्मचाऱ्यांनाही दिवस-रात्रपाळी करुन दुसऱ्या दिवशी गाव-खेडयावर फिरतीही करावी लागते़ त्यामुळे येथील गाव-खेडयापाडयाती गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही़ याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ग़्रामीण भागात बहुतेक ठिकाणी याच प्रकारची परिस्थिती असून आरोग्य सेवा योग्य प्रमाणात मिळत नाही हे लोक गरीब असल्याने त्यांना खाजगी डॉक्टरांची फी परवडणारी नसल्याने त्यांना आपल्या आजाराशी सामना करावा लागत़ याकडे शासनाने लक्ष घालून योग्य अशा सुविधा दयाव्यात अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)