राहुल वाडेकर , तलवाडाविक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धगडीपाडा येथील आदिवासी परिसर गाव-खेडयातील रुग्णांसाठी शासनाने सन- २००६-७ मध्ये उपक्रेंद्रांची इमारत बांधलेली आहे़ परंतु ती गेल्या १० वर्षापासून धूळखात पडून आहे. तिच्या अवती भवती गवताचे जाळे पसरलेल असून या उपकेंद्रांचा बांधल्यापासून १० वर्षात येथील गरीब खेडयातील जनतेला कोणताही उपयोग झालेला नाही़ आजही या लोकांना गावात उपकेंद्र इमारत असतांनाही दोन किलो मीटर खडतर रस्ता पार करुन कुंर्झे येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे़ परंतु रात्री अतितातडीच्या रुग्णास हे धोकादायक असून जिवावर बेतणारे आहे़ याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामसभेत केंद्र सुरु करण्यासंदर्भात ठराव घेवुन त्याची प्रत,तक्रारी अर्ज संबंधीत विभागात दिलेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगत असून अदयापही यावर काहीच उपाय योजना झालेली नाही़ धगडीपाडयाची लोकसंख्या अंदाजीत ५०० ते ६०० च्या आसपास आहे. जवळच आश्रमाळा असुन त्यामध्ये जवळ जवळ ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ परंतु या पाडयात आरोग्याची तशी कोणतीच सुविधा नाही त्यामुळे त्यांना एकमेव कुंर्झे आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे़ तर कुंर्झे आरोग्य केंद्रांत अगोदरच कोणत्याही प्रकारच्या योग्य अशा सुविधा नाही. जवळच जंगल भाग असल्याने रोजच संर्पदंशाचे रुग्ण येत असतांत परंतु या आरोग्य केंद्रात कोणत्याही योग्य अशा सुविधा नसल्याने तसेच आजूबाजूच्या पाडयातील व शहरांशी संपर्क करणारे रस्ते हे खूप खराब असल्याने रुग्णउपचार घेण्याअगोदरच दगावण्याची शक्यता जास्त असते़ तसेच दुर्गम खेडया-पाडयात शासन दरबारी नोेंद नसलेली कुपोषित बालके येतात व त्यांचे मृत्यू होत असतांत खेडयातील लोक गरीब अज्ञानानी असल्याने अशा प्रकारांची नोंद सरकारी दप्तरी होत नाही. कित्येक लोक सर्पदंशाचे शिकार होत असतांत़ कुंर्झंै आरोग्य केंद्रांत महत्वाची पदे रिक्त आहेत़ त्यासाठी येथील ग्रमास्थांना आंदोलनही करावे लागले होते, तर येथील उपलब्ध कर्मचाऱ्यांनाही दिवस-रात्रपाळी करुन दुसऱ्या दिवशी गाव-खेडयावर फिरतीही करावी लागते़ त्यामुळे येथील गाव-खेडयापाडयाती गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही़ याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ग़्रामीण भागात बहुतेक ठिकाणी याच प्रकारची परिस्थिती असून आरोग्य सेवा योग्य प्रमाणात मिळत नाही हे लोक गरीब असल्याने त्यांना खाजगी डॉक्टरांची फी परवडणारी नसल्याने त्यांना आपल्या आजाराशी सामना करावा लागत़ याकडे शासनाने लक्ष घालून योग्य अशा सुविधा दयाव्यात अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
धगडीपाडा उपकेंद्र गेली १० वर्षे खाते आहे धूळ !
By admin | Updated: February 16, 2016 02:20 IST