शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, जयसागरच्या कॅचमेट परिसरात बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:42 IST

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी ...

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात हे आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीला नोटिसा देवून काही बांधकामे थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा काही महिन्यात जैसे थेच सुरु झाले आहे. जयसागर डॅम कॅचमेट परिसरात दिवसेंदिवस वाढलेल्या रहदारीमुळे डॅममधील पाणी दूषित होवून काही वर्षातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.जयसागर डॅमचा हा कॅचमेट परिसर कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असून, येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी या परिसरातील सुरु असलेली बांधकामे थांबविण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. डॅम परिसरात सुरु असलेली बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी मागणी केली आहे.नगरपरिषदेतील १३ हजार नागरिकांची तहान भागविणारा हा डॅम आहे. मात्र कन्स्ट्रक्शन वाढले तर भविष्यात डॅम मधील पाणी खराब होवून जव्हारांसाठी पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि कासटवाडीचे सरपंच यांनी तात्काळ लक्ष घालून सुरु असलेली इमाराती व घरांची बांधकामे थांबवावित अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जव्हार नगरपरिषदेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव स्त्रोत हा जयसागर डॅम असून, त्याच्याच पाण्यावर जव्हार शहरातील १३ हजार लोकसंख्येला अवलंबून राहावे लागत आहे.परिसरातील २५ हजार नागरिकांची तहान तो भागवितो डॅमच्या कॅचमेट परिसरात घरे, बंगले वाढल्यामुळे वाहतूक व प्रदूषण दोनही वाढले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर पेयजलाचा हा एकमेव स्त्रोत संपुष्टात येईल त्याबाबत आताच जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काही वर्षात तर काही वर्षातच धरणात अडविण्यात येणारे पाणी दूषित होवून जव्हारकरांचा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल.>आमची जागा देखील जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे आम्हालाही ग्रामपंचायत कासटवाडी आणि नगररिषदेने रिसॉर्ट बांधायला परवानगी द्यावी. तसेच अन्य लोकांनीही घरे बांधण्यासाठी जागा घेतल्या आहेत. त्यांनाही परवानगी द्यावी. किंवा सगळ्यांना सारखा न्याय लावून सुरु असलेली इमारती व घरांची बांधकामे थांबवावी.- गुलाब विनायक राऊत,जि. प. सदस्य>जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रातील खाजगी जागेत इमारती व घरांची जी बांधकामे सुरु आहेत. ती तातडीने थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.- मिलिंद गायकवाड, ग्रामसेवक>मला आताच चार्ज मिळाला असून, या विषयी मी आमच्या संबधित कर्मचाऱ्यांकडून अधिक माहिती घेवून सांगतो.- प्रसाद बोरीकर, मुख्याधिकारी