शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, जयसागरच्या कॅचमेट परिसरात बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:42 IST

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी ...

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात हे आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीला नोटिसा देवून काही बांधकामे थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा काही महिन्यात जैसे थेच सुरु झाले आहे. जयसागर डॅम कॅचमेट परिसरात दिवसेंदिवस वाढलेल्या रहदारीमुळे डॅममधील पाणी दूषित होवून काही वर्षातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.जयसागर डॅमचा हा कॅचमेट परिसर कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असून, येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी या परिसरातील सुरु असलेली बांधकामे थांबविण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. डॅम परिसरात सुरु असलेली बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी मागणी केली आहे.नगरपरिषदेतील १३ हजार नागरिकांची तहान भागविणारा हा डॅम आहे. मात्र कन्स्ट्रक्शन वाढले तर भविष्यात डॅम मधील पाणी खराब होवून जव्हारांसाठी पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि कासटवाडीचे सरपंच यांनी तात्काळ लक्ष घालून सुरु असलेली इमाराती व घरांची बांधकामे थांबवावित अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जव्हार नगरपरिषदेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव स्त्रोत हा जयसागर डॅम असून, त्याच्याच पाण्यावर जव्हार शहरातील १३ हजार लोकसंख्येला अवलंबून राहावे लागत आहे.परिसरातील २५ हजार नागरिकांची तहान तो भागवितो डॅमच्या कॅचमेट परिसरात घरे, बंगले वाढल्यामुळे वाहतूक व प्रदूषण दोनही वाढले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर पेयजलाचा हा एकमेव स्त्रोत संपुष्टात येईल त्याबाबत आताच जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काही वर्षात तर काही वर्षातच धरणात अडविण्यात येणारे पाणी दूषित होवून जव्हारकरांचा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल.>आमची जागा देखील जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे आम्हालाही ग्रामपंचायत कासटवाडी आणि नगररिषदेने रिसॉर्ट बांधायला परवानगी द्यावी. तसेच अन्य लोकांनीही घरे बांधण्यासाठी जागा घेतल्या आहेत. त्यांनाही परवानगी द्यावी. किंवा सगळ्यांना सारखा न्याय लावून सुरु असलेली इमारती व घरांची बांधकामे थांबवावी.- गुलाब विनायक राऊत,जि. प. सदस्य>जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रातील खाजगी जागेत इमारती व घरांची जी बांधकामे सुरु आहेत. ती तातडीने थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.- मिलिंद गायकवाड, ग्रामसेवक>मला आताच चार्ज मिळाला असून, या विषयी मी आमच्या संबधित कर्मचाऱ्यांकडून अधिक माहिती घेवून सांगतो.- प्रसाद बोरीकर, मुख्याधिकारी