शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, जयसागरच्या कॅचमेट परिसरात बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:42 IST

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी ...

- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जयसागर डॅमच्या कॅचमेट परिसरालगत नवीन बंगले, घरे, आदी खाजगी बांधकामाचा सुळसुळाट झाला असून प्रसारमाध्यामांनी यापूर्वी प्रशासनाच्या लक्षात हे आणून दिल्यानंतर ग्रामपंचायतीला नोटिसा देवून काही बांधकामे थांबविण्यात आली होती. मात्र पुन्हा काही महिन्यात जैसे थेच सुरु झाले आहे. जयसागर डॅम कॅचमेट परिसरात दिवसेंदिवस वाढलेल्या रहदारीमुळे डॅममधील पाणी दूषित होवून काही वर्षातच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.जयसागर डॅमचा हा कॅचमेट परिसर कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असून, येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी या परिसरातील सुरु असलेली बांधकामे थांबविण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. डॅम परिसरात सुरु असलेली बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी मागणी केली आहे.नगरपरिषदेतील १३ हजार नागरिकांची तहान भागविणारा हा डॅम आहे. मात्र कन्स्ट्रक्शन वाढले तर भविष्यात डॅम मधील पाणी खराब होवून जव्हारांसाठी पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि कासटवाडीचे सरपंच यांनी तात्काळ लक्ष घालून सुरु असलेली इमाराती व घरांची बांधकामे थांबवावित अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जव्हार नगरपरिषदेतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठीचा एकमेव स्त्रोत हा जयसागर डॅम असून, त्याच्याच पाण्यावर जव्हार शहरातील १३ हजार लोकसंख्येला अवलंबून राहावे लागत आहे.परिसरातील २५ हजार नागरिकांची तहान तो भागवितो डॅमच्या कॅचमेट परिसरात घरे, बंगले वाढल्यामुळे वाहतूक व प्रदूषण दोनही वाढले आहेत. जर ही स्थिती कायम राहिली तर पेयजलाचा हा एकमेव स्त्रोत संपुष्टात येईल त्याबाबत आताच जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काही वर्षात तर काही वर्षातच धरणात अडविण्यात येणारे पाणी दूषित होवून जव्हारकरांचा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल.>आमची जागा देखील जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे आम्हालाही ग्रामपंचायत कासटवाडी आणि नगररिषदेने रिसॉर्ट बांधायला परवानगी द्यावी. तसेच अन्य लोकांनीही घरे बांधण्यासाठी जागा घेतल्या आहेत. त्यांनाही परवानगी द्यावी. किंवा सगळ्यांना सारखा न्याय लावून सुरु असलेली इमारती व घरांची बांधकामे थांबवावी.- गुलाब विनायक राऊत,जि. प. सदस्य>जयसागर डॅम पाणलोट क्षेत्रातील खाजगी जागेत इमारती व घरांची जी बांधकामे सुरु आहेत. ती तातडीने थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.- मिलिंद गायकवाड, ग्रामसेवक>मला आताच चार्ज मिळाला असून, या विषयी मी आमच्या संबधित कर्मचाऱ्यांकडून अधिक माहिती घेवून सांगतो.- प्रसाद बोरीकर, मुख्याधिकारी