शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पटसंख्ये अभावी जि.प.च्या शाळा बंद करण्याचे निकष नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:24 IST

जिल्हयातील एक किलोमिटरच्या आत दोन ते तीन शाळा असल्यास त्या शाळा केंद्रशाळेला जोडून बाकी शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले

- लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रमगड : जिल्हयातील एक किलोमिटरच्या आत दोन ते तीन शाळा असल्यास त्या शाळा केंद्रशाळेला जोडून बाकी शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले असून त्याची अंमलबजावणी येत्या ३१ जुलै पर्यत पूर्ण करावयाची आहे़ त्याअनुशांगाने विक्रमगड तालुक्यातील १० शाळांचे प्रस्ताव आहेत मात्र या १० शाळांतील ७ शाळा या जवळजवळ दिड किलोमिटर अंतराच्या असून देखील त्या बंद करण्याचे आदेश असल्याने हा आदेश नियम बाहय असल्याचा आरोप श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केला आहे.विक्रमगड येथील जि़ प़ शाळांची तपासणी करीत असतांना बंद करण्यात येत असलेल्या गहलेपाडा येथील जि़ प़ शाळेची पाहणी केल्यानंतर केला आहे़या नियमबाहय आदेशाविरोधात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सोमवारी कोर्टामध्ये याचिका दाखल केलीे असून लवकरच त्याला स्टे मिळेल असे सांगितले़ आज ग्रामीण खेडयापाडयामध्ये शाळा बाहय विदयार्थी शिकला पाहीजे हे उद्दीष्ट समोर ठेवून गाव-पाडयात शाळा सुरु करण्यात आल्या व शासनाने त्याकरीता इमारतींवर करोडो रुपये खर्च केलेले आहेत़ आज यामुळे खेडयातील आदिवासी शिक्षित होत असतांना शाळा बंद करण्याचे आदेश काढणे चुकीचे आहे़ खेडयावर दिवसभर शेतीचे काम करणारा मुलांच्या शिक्षणाकडे पाहत नाही शिक्षण फुकट असतांनाही तो मुलांना शाळेत पाठवत नाही आणि आता शाळाच बंद झाल्या तर शाळा बाहय विदयार्थ्याची संख्या अधिक होईल व आदिवासिंची मुले शिक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे शासनाने शिक्षणांची कत्तल आरंभिली आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला असून शाळा पाहाणीमध्ये श्रमजीवीच्या पालघर जिल्हा जेष्ठ कार्यकर्ती आराध्या पंडित, उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे, तालुका संघटक रुपेश डोले सचिव कैलास तुंबडा आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते़शासनाने गहलेपाडा ही २० पटसंख्या असलेली शाळा बंद केली आहे. येथील मुलांना केंद्रशाळा चिंचघर येथे हरविण्याचे आदेश येथील शिक्षकांना आहेत़ परंतु चिंचघर ते गहलेपाडा हे अंतर दिड किलो मीटरचे असल्याने ते नियम बाहय आहे़ आणि इयत्ता पहिली ते चौथीचे विदयार्थी लहान असल्याने त्यांना हा लांबपल्याचा पायी प्रवास न झेपणारा असून रस्त्यावरुन चालतांना अपघात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे येथील पालकांनी ही शाळा बंद करण्यास विरोधत दर्शविला आहे. जर ही शाळा बंद झाली तर आम्ही आमच्या मुलांसह विक्रमगड शिक्षणविभागात ठिंया मांडुन बसू असे पालक रमेश लहांगे,व बाबुराव सोडे यांसह अन्य पालकांनी इशारा दिला आहे.