शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

डहाणू महावितरण कार्यालयावर माकपचा ठिय्या

By admin | Updated: March 30, 2017 05:24 IST

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागतो आहे.

डहाणू : स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागतो आहे. जग चंद्रावर पोचले. मात्र येथील डोंगर दर्यात राहणाऱ्या आदिवासींना विजेसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. या बाबत माकपने सातत्याने पाठपुरावा करूनही वीजजोडणी सुरु न केल्याने बुधवार दुपारपासून महावितरणरच्या कार्र्यालयासमोर बेमुदत ठिय्या देण्यात आला आहे.विजेचा लपंडाव, भारनियमन, विजेचे अव्वाच्या सव्वा बील तसेच विशेष भरारी पथके याला. वीजग्राहक कंटाळले असतानाच डहाणूच्या मुसळपाडा, खुमारपाडा, वाकी प्रभुपाडा, कोशेसरी, शेनसरी , आंवढाणी, पावन, दाभोण, कवडास, ओसरवीरा, वांगर्जे, वेती इत्यादी जंगल पट्टी भागात अद्याप वीज पोचली नसल्याने येथील विकास खुटंला अहे परिणामी आदिवासीना अंधारात जीवन जगावे लागत आहे. डहाणू तालुक्याल गेल्या सहा महिन्यांपासून मीटर रिडिंग न घेता विजेचे अव्वाच्या सव्वा बिल पाठवले जात आहे.त्यात गंजाड, रायतळी, सरावली या भागात आदिवासींना ३५ हजाराचे बील. आल्याने महावितरणचा सावळागोंधळ समोर आलेला आहे परिणामी वीजपुरवठा खंडीत करुन आदिवासिंना अंधारात ठेवले जात आहे. डहाणू तालुक्यातील जंगल पट्टी भागात मुंबई अहमादाबाद हायवेच्या पलिकडे गावपाड्यांना वारंवार निवेदन देऊनही वीज पुरवली जात नसल्याने आदिवासींचे जीवन अंधारमय झाले आहे. दरम्यान कैनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाकी प्रभुपाडा, खुमारपाडा येथे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही. तसेच विजेचे खांब,विद्युत तारा जीर्ण व जुनाट झाल्याने ते त्वरीत बदलावे यासाठी माकपतर्फे डहाणू महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याबाबतीत वेळोवेळी आश्वासन देऊनही विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. अखेर बुधवारी बेमुदत ठिय्या देण्यात आला. यावेळी विनोद निकोले, गणेश आकरे, चंद्रकांत गोरखना आदि उपस्थित होते.(वार्ताहर)