शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

डहाणू महावितरण कार्यालयावर माकपचा ठिय्या

By admin | Updated: March 30, 2017 05:24 IST

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागतो आहे.

डहाणू : स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही डहाणू तालुक्यातील आदिवासी पाड्यांना विजेअभावी अंधाराचा सामना करावा लागतो आहे. जग चंद्रावर पोचले. मात्र येथील डोंगर दर्यात राहणाऱ्या आदिवासींना विजेसाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. या बाबत माकपने सातत्याने पाठपुरावा करूनही वीजजोडणी सुरु न केल्याने बुधवार दुपारपासून महावितरणरच्या कार्र्यालयासमोर बेमुदत ठिय्या देण्यात आला आहे.विजेचा लपंडाव, भारनियमन, विजेचे अव्वाच्या सव्वा बील तसेच विशेष भरारी पथके याला. वीजग्राहक कंटाळले असतानाच डहाणूच्या मुसळपाडा, खुमारपाडा, वाकी प्रभुपाडा, कोशेसरी, शेनसरी , आंवढाणी, पावन, दाभोण, कवडास, ओसरवीरा, वांगर्जे, वेती इत्यादी जंगल पट्टी भागात अद्याप वीज पोचली नसल्याने येथील विकास खुटंला अहे परिणामी आदिवासीना अंधारात जीवन जगावे लागत आहे. डहाणू तालुक्याल गेल्या सहा महिन्यांपासून मीटर रिडिंग न घेता विजेचे अव्वाच्या सव्वा बिल पाठवले जात आहे.त्यात गंजाड, रायतळी, सरावली या भागात आदिवासींना ३५ हजाराचे बील. आल्याने महावितरणचा सावळागोंधळ समोर आलेला आहे परिणामी वीजपुरवठा खंडीत करुन आदिवासिंना अंधारात ठेवले जात आहे. डहाणू तालुक्यातील जंगल पट्टी भागात मुंबई अहमादाबाद हायवेच्या पलिकडे गावपाड्यांना वारंवार निवेदन देऊनही वीज पुरवली जात नसल्याने आदिवासींचे जीवन अंधारमय झाले आहे. दरम्यान कैनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाकी प्रभुपाडा, खुमारपाडा येथे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही. तसेच विजेचे खांब,विद्युत तारा जीर्ण व जुनाट झाल्याने ते त्वरीत बदलावे यासाठी माकपतर्फे डहाणू महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याबाबतीत वेळोवेळी आश्वासन देऊनही विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. अखेर बुधवारी बेमुदत ठिय्या देण्यात आला. यावेळी विनोद निकोले, गणेश आकरे, चंद्रकांत गोरखना आदि उपस्थित होते.(वार्ताहर)