शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

विक्रमगडचे न्यायालय लालफितीत

By admin | Updated: February 24, 2016 02:55 IST

दीड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यासाठी न्यायालय मंजूर झाले असूनही आजपावेतो ते साकारले नाही. ते अद्यापही प्रश्न लालफितीतच आडकले आहे़ त्यामुळे आजही येथील नागरिकांना

- राहुल वाडेकर, तलवाडादीड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यासाठी न्यायालय मंजूर झाले असूनही आजपावेतो ते साकारले नाही. ते अद्यापही प्रश्न लालफितीतच आडकले आहे़ त्यामुळे आजही येथील नागरिकांना आपल्या केसेस घेऊन जव्हार, वाडा किंवा भिवंडी येथील न्यायालयात खेटे मारावे लागत आहेत. गोरगरीबांच्या दृष्टीने ते खूप गैरसोयीचे व खर्चीक असल्याने स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती लवकरात लवकर करण्यासाठी आमदार, खासदार व आदिवासी विकास मंत्री यांनी प्रयत्न करावे अशी एकमुखी मागणी येथील नागरिक करीत आहेत़ विक्रमगड तालुकया कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत, ग्रामदानमंडळ व ग्रुप-ग्रामपंचायत असे मिळून एकुण ४२ स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत़ गांवाची संख्या ९४ असून लोकसंख्या दीड लांखाच्या घरात आहे़ येथे पोलिस कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालये व तालुक्याची व्यापारी बाजारपेठ आहे. असे असूनही गेल्या १७ वर्षात स्वतंत्र न्यायालय नसल्याने येथील नागरिकांना पदरमोड करुन अन्य शहरांच्या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत़ त्यामुळे दिवस, वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो आहे.तालुक्याचा दिवसेंदिवस वाढता विस्तार व नागरीकरण पाहाता मंजूर असलेल्या या न्यायालयाची साकारणी तातडीने होण्याची आवश्यकता आहे़ तालुक्याकरीता स्वतंत्र न्यायालयाचा प्रस्ताव तयार आहे़ त्या करीता भूखंडही आरक्षित ठेवण्यांत आला होता त्याची पाहाणीही करण्यांत आली होती परंतु आजपावेतो त्याची अंमलबजावणी झालेली नाही़ जव्हार तालुक्यातून विभाजन करुन १९९९ मध्ये विक्रमगड तालुका स्वतंत्र करण्यांत आला़ तेंव्हा पासून येथे न्यायालय नाही त्यामुळे लवकरात लवकर न्यायालय कार्यान्वीत करावे अशी जनतेची मागणी आहे़