शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

२ कोटींच्या क्रीडांगण निधीत भ्रष्टाचार

By admin | Updated: September 25, 2016 03:57 IST

जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने क्रीडांगणाच्या विकासासाठी आश्रमशाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर वितरित केलेल्या २ कोटीच्या निधी वापरात मोठा भ्रष्टाचार झाला असून

- हितेन नाईक, पालघरजिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने क्रीडांगणाच्या विकासासाठी आश्रमशाळा आणि ग्रामपंचायत पातळीवर वितरित केलेल्या २ कोटीच्या निधी वापरात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.नियोजन विकास मंडळाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना आदिवासी उपाययोजनेतर्गत क्रीडांगण विकासा साठी सन २०१५-१६ या सालाकरिता सुमारे दोन कोटींच्या अनुदानचे वाटप करण्यात आले असून या अनुदानातून कामे झाल्याचे कागदोपत्री दाखिवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कोणत्या प्रकारची कामे करण्यात आली आहेत या संदर्भात कुठलीही कागदपत्रे अथवा माहिती अधिकाऱ्या कडून पुरविली जात नसल्याची तक्रारही करण्यात येत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चे माजी सचिव केदार काळे, नगरसेविका उज्वला काळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांची भेट घेत या प्रकरणी कसून चौकशीची मागणी केली आहे.पालघर जिल्ह्यात अनेक उदयोन्मुख खेळाडू असून जिल्हा,राज्य पातळीवर आपली चमक दाखवीत आहेत.मात्र या जिल्हा क्रीडा विभागा कडून त्यांना हव्या असलेल्या सोयी सुविधा, क्र ीडांगणे आणि साहित्याचा पुरवठा होत नसल्याने त्यांच्या मध्ये विशेष नैपुण्य असूनही विशेष चमक दाखवता येत नाही.अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. शाळा, ग्रामपंचायती, विविध क्र ीडा मंडळे इ, ना लाखो रु पयांचे अनुदान वाटप करताना त्याचा योग्य वापर करण्यात आला आहे का? क्र ीडापटू ना त्याचा फायदा होतो का? याचा तपास हि जिल्हाप्रशासनाने घ्यावा.पालघर तालुका क्र ीडा संकुलाचे काम अनेक वर्षा पासून अपूर्णावस्थेत पडून असून बॅडमिंटन हॉल चे कामही अपूर्ण आहे. सध्या त्याचा वापर प्रशासना कडून व्होटिंग मशीन इ, साहित्य ठेवण्यासाठी एक गोदाम म्हणून करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कडे क्र ीडा संकुलाचा सुमारे ३० लाखाचा निधी पडून असल्याने नवीन निधी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.त्या मुळे हा निधी तात्काळ खर्च करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही या वेळी करण्यात आली. जिल्हाक्रीडा कार्यालयही सुरु झालेले नाही, पुण्यातील राज्य क्र ीडा संचालनालयाने ठाणे जिल्हा क्र ीडा कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती पालघर जिल्ह्यात केली असतानाही त्यांना ठाण्यातून पदमुक्त केले जात नाही. त्याचा विपरीत परिणाम क्र ीडा धोरणावर होत असल्याचे काळे यांनी निदर्शनास आणून दिले.