शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची कारवाई, १० लाखांपर्यंतचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:54 IST

प्लास्टिक बंदी करून एक वर्ष झाले असले तरी वसई तालुक्यात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे.

विरार : प्लास्टिक बंदी करून एक वर्ष झाले असले तरी वसई तालुक्यात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. या बेकायदेशीर प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करून १० लाखांचा दंड वसूल केला आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदी असली तरी अजूनही दुकानांमध्ये तसेच घरी प्लास्टिकचा वापर सुरू आहे. महानगरपालिकेने अनेकदा याबाबतीत आळा घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यात तेवढे यश आलेले नाही. यामुळेच महानगरपालिकेने प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. काही दिवसांपासून महानगरपालिकेने ही मोहीम अधिकच तीव्र केली असून ठोस कारवाई केली आहे. वसई - विरार महानगरपालिकेच्या परिसरात बसणा-या फेरीवाल्यांपासून मोठ्या बाजारपेठेत बसणा-या फळ तसेच भाजी विक्रेत्यांपर्यंत तपासणी करण्यात आली. यावेळी ४० हजारहून अधिक दुकानांची तपासणी झाली. तसेच चारशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिकेतर्फे ठोस कारवाई होत नसल्याने प्लास्टिकचा वापर कमी होण्याऐवजी वाढत होता. महानगरपालिकेतर्फे वसई, नालासोपारा, वालीव, बोळींज, चंदनसार अशा प्रत्येक प्रभाग समितीची तपासणी करण्यात आलेली आहे. यावेळी महानगरपालिकेने १० लाखांचा दंड वसूल केला आहे.अनेकदा जनजागृती करून देखील आणि प्लास्टिक बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचा ºहास होत आहे. तर महानगरपालिकेने नागरिकांना तसेच फेरीवाल्यांना व दुकानदारांना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. ही मोहीम अशीच सुरु राहील, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.वसई तालुक्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी महानगरपालिकेने ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही कारवाई अशीच पुढे सुरु राहणार आहे. प्लास्टिक बंदीचा नियम पाळला जाणे गरजेचे आहे.-वसंत मुकणे, वसई- विरार महानगरपालिका, स्वच्छता विभाग अधिकारी 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरार