शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची कारवाई, १० लाखांपर्यंतचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:54 IST

प्लास्टिक बंदी करून एक वर्ष झाले असले तरी वसई तालुक्यात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे.

विरार : प्लास्टिक बंदी करून एक वर्ष झाले असले तरी वसई तालुक्यात अनेक ठिकाणी बिनधास्तपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. या बेकायदेशीर प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करून १० लाखांचा दंड वसूल केला आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदी असली तरी अजूनही दुकानांमध्ये तसेच घरी प्लास्टिकचा वापर सुरू आहे. महानगरपालिकेने अनेकदा याबाबतीत आळा घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यात तेवढे यश आलेले नाही. यामुळेच महानगरपालिकेने प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. काही दिवसांपासून महानगरपालिकेने ही मोहीम अधिकच तीव्र केली असून ठोस कारवाई केली आहे. वसई - विरार महानगरपालिकेच्या परिसरात बसणा-या फेरीवाल्यांपासून मोठ्या बाजारपेठेत बसणा-या फळ तसेच भाजी विक्रेत्यांपर्यंत तपासणी करण्यात आली. यावेळी ४० हजारहून अधिक दुकानांची तपासणी झाली. तसेच चारशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली.प्लास्टिक विक्रेत्यांवर महानगरपालिकेतर्फे ठोस कारवाई होत नसल्याने प्लास्टिकचा वापर कमी होण्याऐवजी वाढत होता. महानगरपालिकेतर्फे वसई, नालासोपारा, वालीव, बोळींज, चंदनसार अशा प्रत्येक प्रभाग समितीची तपासणी करण्यात आलेली आहे. यावेळी महानगरपालिकेने १० लाखांचा दंड वसूल केला आहे.अनेकदा जनजागृती करून देखील आणि प्लास्टिक बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचा ºहास होत आहे. तर महानगरपालिकेने नागरिकांना तसेच फेरीवाल्यांना व दुकानदारांना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. ही मोहीम अशीच सुरु राहील, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.वसई तालुक्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी महानगरपालिकेने ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही कारवाई अशीच पुढे सुरु राहणार आहे. प्लास्टिक बंदीचा नियम पाळला जाणे गरजेचे आहे.-वसंत मुकणे, वसई- विरार महानगरपालिका, स्वच्छता विभाग अधिकारी 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीVasai Virarवसई विरार