शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

CoronaVirus News: वसई-विरार महापालिका परिसरामध्ये रक्ततुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:14 IST

रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : पालिका प्रशासनाचे सामाजिक संस्थांना आवाहन

- आशिष राणेवसई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रक्ततुटवडा भासू शकतो, असे लक्षात येताच महापालिका वैद्यकीय आरोग्य प्रशासनाने शहरांतील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अशी शिबिरे आयोजित करणाऱ्या आयोजकांना आवाहन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक दी चेन' अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता असते तसेच प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. किंबहुना राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, राजकीय, धार्मिक संस्था इ. आयोजकांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. त्यानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र निर्बंध लागू केलेले आहेत. परंतु, या निर्बंधातून वैद्यकीय व आरोग्यसेवा यांना सूट देण्यात आलेली आहे. तसेच रक्त संक्रमण सेवेलाही या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे.दरम्यान, आयोजकांकडून रक्तदान शिबिरे ही साधारणत: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात. तसेच आता रक्ताची गरज असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ६ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजकांनी कोविडसंदर्भात दिलेल्या व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन वसई- विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.