शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वसई-विरार महापालिका परिसरामध्ये रक्ततुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:14 IST

रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : पालिका प्रशासनाचे सामाजिक संस्थांना आवाहन

- आशिष राणेवसई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रक्ततुटवडा भासू शकतो, असे लक्षात येताच महापालिका वैद्यकीय आरोग्य प्रशासनाने शहरांतील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अशी शिबिरे आयोजित करणाऱ्या आयोजकांना आवाहन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक दी चेन' अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता असते तसेच प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. किंबहुना राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, राजकीय, धार्मिक संस्था इ. आयोजकांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. त्यानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र निर्बंध लागू केलेले आहेत. परंतु, या निर्बंधातून वैद्यकीय व आरोग्यसेवा यांना सूट देण्यात आलेली आहे. तसेच रक्त संक्रमण सेवेलाही या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे.दरम्यान, आयोजकांकडून रक्तदान शिबिरे ही साधारणत: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात. तसेच आता रक्ताची गरज असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ६ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजकांनी कोविडसंदर्भात दिलेल्या व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन वसई- विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.