शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

CoronaVirus News: वसई-विरार महापालिका परिसरामध्ये रक्ततुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:14 IST

रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : पालिका प्रशासनाचे सामाजिक संस्थांना आवाहन

- आशिष राणेवसई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रक्ततुटवडा भासू शकतो, असे लक्षात येताच महापालिका वैद्यकीय आरोग्य प्रशासनाने शहरांतील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अशी शिबिरे आयोजित करणाऱ्या आयोजकांना आवाहन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक दी चेन' अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता असते तसेच प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. किंबहुना राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, राजकीय, धार्मिक संस्था इ. आयोजकांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. त्यानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र निर्बंध लागू केलेले आहेत. परंतु, या निर्बंधातून वैद्यकीय व आरोग्यसेवा यांना सूट देण्यात आलेली आहे. तसेच रक्त संक्रमण सेवेलाही या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे.दरम्यान, आयोजकांकडून रक्तदान शिबिरे ही साधारणत: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात. तसेच आता रक्ताची गरज असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ६ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजकांनी कोविडसंदर्भात दिलेल्या व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन वसई- विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.