शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

CoronaVirus Lockdown News: वसईतील व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:41 IST

दुकाने बंद ठेवण्याच्या निर्बंधांना विरोध : उपासमारीची वेळ येण्याची भीती

विरार : वसई-विरार महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घातलेल्या निर्बंधांना विरोध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली होती; मात्र वसई-विरार महापालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मागील वर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले आहे; यापुढे मात्र व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे पालिकेने हे निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी वसई-विरारमधील व्यापाऱ्यांनी पालिकेवर ही धडक दिली होती. वसई-विरार शहरात पाच हजारपेक्षा जास्त व्यापारी आहेत. विविध व्यवसायात असलेल्या या व्यापाऱ्यांकडे भाडेतत्त्वावरील दुकाने आहेत. याशिवाय दुकानातील नोकर-चाकर, वीजबिल आणि व्यवसायात लागलेले लाखो रुपये, त्यासाठी काढलेली कर्जे याने हे व्यापारी मेटाकुटीस आलेले असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर निर्बंध लादले गेल्याने पालिकेविरोधात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान; वसई-विरार महापालिका मुख्यालयात मनाई आदेश लागू असल्याने पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेण्यास नकार दिला.