शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

CoronaVirus Lockdown News: वसईतील व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:41 IST

दुकाने बंद ठेवण्याच्या निर्बंधांना विरोध : उपासमारीची वेळ येण्याची भीती

विरार : वसई-विरार महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घातलेल्या निर्बंधांना विरोध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली होती; मात्र वसई-विरार महापालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मागील वर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले आहे; यापुढे मात्र व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे पालिकेने हे निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी वसई-विरारमधील व्यापाऱ्यांनी पालिकेवर ही धडक दिली होती. वसई-विरार शहरात पाच हजारपेक्षा जास्त व्यापारी आहेत. विविध व्यवसायात असलेल्या या व्यापाऱ्यांकडे भाडेतत्त्वावरील दुकाने आहेत. याशिवाय दुकानातील नोकर-चाकर, वीजबिल आणि व्यवसायात लागलेले लाखो रुपये, त्यासाठी काढलेली कर्जे याने हे व्यापारी मेटाकुटीस आलेले असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर निर्बंध लादले गेल्याने पालिकेविरोधात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान; वसई-विरार महापालिका मुख्यालयात मनाई आदेश लागू असल्याने पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेण्यास नकार दिला.