शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
2
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
3
Video: भरमैदानात बाचाबाची अन् हाणामारी! एकाने खेचलं हेल्मेट तर दुसऱ्याने चक्क बॅटने...
4
सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण?
5
कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी, पाचा आरोपी झाले फरार  
6
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?
7
Corona Virus : गर्भातील बाळासाठी किती धोकादायक असू शकतो कोरोनाचा नवा व्हेरियंट?
8
Upcoming Cars : भारतात जून महिन्यात लॉन्च होतायत या 5 जबरदस्त कार, इलेक्ट्रिक कारचाही समावेश
9
12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार!
10
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
11
ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून फसवणूक, तीन भारतीय तरुणांचं इराणमधून अपहरण, कुटुंबीयांकडे मागितली खंडणी  
12
ठाकरे गटाकडून  मुंबईकरांशी एक लाख कोटींची बेईमानी, आशिष शेलार यांचा थेट आरोप
13
June Astro 2025: जूनमध्ये बुधादित्य राजयोगात 'या' पाच राशींचे नशीब झळकणार, आर्थिक अडचणी दूर होणार!
14
"माझी मुलगी म्हणतेय ती निर्दोष आहे"; ज्योतीला तुरुगांत भेटून आल्यावर काय म्हणाले वडील हरीश मल्होत्रा?
15
अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण
16
चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी
17
Sheikh Hasina: 'रक्तपात टाळायचा असेल, तर...'; शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सोडलं पंतप्रधान पद?
18
भारतात नवाब होते, तेव्हा हिरे जड-जवाहिर घेऊन विमानाने पाकिस्तानात गेलेले; आता शिपायाएवढीही....
19
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
20
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

CoronaVirus Lockdown News: व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:13 IST

दुकानबंदीसाठी प्रशासनाची कारवाई

नालासोपारा : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांचा फटका व्यावसायिक, दुकानदार, व्यापाऱ्यांना बसला आहे.  कारवाईच्या धास्तीने अनेक दुकाने तसेच व्यवसाय मंगळवारी बंद होते, तर प्रशासनाने अनेक दुकानांवर बंदची कारवाई केली. दरम्यान, पुन्हा लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला राज्यातील व्यापारी संघटना विरोध करत आहेत. एकीकडे मंगळवारी सकाळपासून मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिका कर्मचारी आणि पोलीस अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करत होते, तर दुसरीकडे संतप्त व्यापारी, दुकानदारांनी तुळिंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढीत निषेध व्यक्त केला.राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणे गरजेचे आहे; परंतु असे करताना उद्योगांवरील आर्थिक संकट लक्षात घेतले पाहिजे. कारण लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे कोलमडून पडतात, रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी आधीच अडचणीत सापडलेल्या व्यापारी, उद्योजक, दुकानदारांचा विचार करणे गरजेचे असून  दुकानदार, व्यावसायिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत मेडिकलप्रमाणे इतर दुकाने, व्यावसायिकांचाही समावेश करावा, अशी मागणी व्यापारी संघटना करत आहेत.मंगळवारी सकाळच्या वेळी पोलीस हद्दीतील दुकाने बंद करत होते. मिनी लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी असताना पोलीस दुकाने का बंद करत आहे, यामुळे लोक संभ्रमात पडले होते. संतप्त १०० ते १५० दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात धाव घेत मोर्चा काढला. पोलिसांनी महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सोमवारी रात्री काढलेल्या आदेशाची प्रत दाखवून दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याचे दाखवले. आयुक्तांनी व्यापारी, दुकानदारांना विचारात न घेता किंवा याबाबत काहीही न सांगता असे पाऊल का उचलले, असा सवाल उपस्थित केला.  सामान्य नागरिकांना मनपा मुख्यालयात प्रवेशबंदीमंगळवारी सकाळपासून वसई-विरार महानगरपालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास मनपा आयुक्तांनी बंदी घातली आहे. आपत्कालीन व्यवस्था हाताळणाऱ्या महत्त्वाच्या कार्यालयात असे सरसकट प्रवेश नाकारणे अयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.संचारबंदी सर्वत्र लागू झाली असल्याने सोमवारी संध्याकाळी आयुक्तांनी आदेश काढला आहे. ४ एप्रिलला राज्य सरकारने पूर्ण राज्यासाठी कोरोनामुळे एसओपी दिलेली आहे. कोरोना रुग्णवाढीवर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहे. आयुक्तांनी सोमवारी संध्याकाळी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यतिरिक्त दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.- गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई विरार महापालिका