शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

CoronaVirus News: वसईत १० हजार ४७९ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:00 IST

एकूण बाधित रुग्ण १३,६७७ : उपचार घेताहेत २,९०९

विरार : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घबराट निर्माण झालेली असतानाच आजवर या जीवघेण्या आजारातून १० हजार ४७९ रुग्णांनी मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण रुग्णबाधितांची संख्या १३ हजार ६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे. दरम्यान, केवळ दोन हजार ९०९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये मध्यंतरीच्या काळात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते. दिवसभरात ज्या संख्येने रुग्ण आढळत होते, ते पाहता पालिका हद्दीतील शहरांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अद्यापही लोकांमध्ये ही भीती कायम आहे, मात्र तरीही अलीकडच्या काळात पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ज्या पद्धतीने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. त्याचीच प्रचीती म्हणून सध्या पालिका हद्दीतील साडेदहा हजारहून जास्त रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहेत.वसई, नालासोपारा आणि विरार तसेच नवघर-माणिकपूर या शहरांमधील बहुसंख्य नागरिक रोजीरोटीसाठी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी जात असतात. वसईत पहिला रुग्ण जरी परदेशातून आलेला आढळला होता, तरी पुढील काळात नालासोपारा, विरार तसेच वसई भागात आढळलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबई-ठाण्यात नोकरीधंद्यानिमित्त आलेले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पुढे त्या त्या रुग्णांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अन्य लोकांनाही कोरोनाबाधा झाल्याने महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता, मात्र आता महापालिकेने रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलेले आहे. त्यामुळेच बरे होणाऱ्यांच्या मोठ्या संख्येबरोबरच उपचार घेणाºयांची घटलेली संख्याही चिंता कमी करणारी आहे.वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये एकूण रुग्णबाधितांची संख्या १३,६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे.दरम्यान, केवळ २,९०९ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या