शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सततच्या पावसाने विक्रमगडातील भातरोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:42 IST

पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान :भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे जर पाऊस अजून लांबल्यास पावसाच्या या सातत्यामुळे भातशेती हे प्रमुख पीक अडचणीत येणार आहे.सर्वत्र भात लावणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. गेल्या बारा दिवसापासून सततचा पाऊस बरसत आहे. बारा दिवसापासून शेतात पाणी भरून रोपे बुडून गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयाची भात पिकाची रोपे कुजली आहेत. अद्यापही पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकºयाच्या मुखीचा घास हिरावून घेतला जातो की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पुरामुळे विक्रमगड तालुक्यातील काही भागातील भातरोपे वाहून गेली आहे. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत तर काहीच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली गेली आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे. झालेल्या शेतकºयाच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी हवे होतेमात्र तो मुसळधारपणे कोसळत आहे. लावणी झालेल्या भातपिकाची शेतामध्ये पाणी भरून असल्याने पिके पाण्यात बुडून आहेत. पिकाची मुळे व रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षात जसे भात पिकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.