शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने विक्रमगडातील भातरोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:42 IST

पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान :भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे जर पाऊस अजून लांबल्यास पावसाच्या या सातत्यामुळे भातशेती हे प्रमुख पीक अडचणीत येणार आहे.सर्वत्र भात लावणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. गेल्या बारा दिवसापासून सततचा पाऊस बरसत आहे. बारा दिवसापासून शेतात पाणी भरून रोपे बुडून गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयाची भात पिकाची रोपे कुजली आहेत. अद्यापही पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकºयाच्या मुखीचा घास हिरावून घेतला जातो की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पुरामुळे विक्रमगड तालुक्यातील काही भागातील भातरोपे वाहून गेली आहे. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत तर काहीच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली गेली आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे. झालेल्या शेतकºयाच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी हवे होतेमात्र तो मुसळधारपणे कोसळत आहे. लावणी झालेल्या भातपिकाची शेतामध्ये पाणी भरून असल्याने पिके पाण्यात बुडून आहेत. पिकाची मुळे व रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षात जसे भात पिकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.