शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सततच्या पावसाने विक्रमगडातील भातरोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:42 IST

पुरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान :भात पिकाचे पंचनामे करण्याची मागणी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे जर पाऊस अजून लांबल्यास पावसाच्या या सातत्यामुळे भातशेती हे प्रमुख पीक अडचणीत येणार आहे.सर्वत्र भात लावणी ९० टक्के पूर्ण झाली आहे. गेल्या बारा दिवसापासून सततचा पाऊस बरसत आहे. बारा दिवसापासून शेतात पाणी भरून रोपे बुडून गेल्याने तालुक्यातील अनेक शेतकºयाची भात पिकाची रोपे कुजली आहेत. अद्यापही पाउस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकºयाच्या मुखीचा घास हिरावून घेतला जातो की काय? अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पुरामुळे विक्रमगड तालुक्यातील काही भागातील भातरोपे वाहून गेली आहे. शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत तर काहीच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली गेली आहेत. तर अनेकांची भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहे. झालेल्या शेतकºयाच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी हवे होतेमात्र तो मुसळधारपणे कोसळत आहे. लावणी झालेल्या भातपिकाची शेतामध्ये पाणी भरून असल्याने पिके पाण्यात बुडून आहेत. पिकाची मुळे व रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षात जसे भात पिकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.