शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

स्मशानभूमी आहे तरी नदीपात्रात दहन

By admin | Updated: February 22, 2016 00:19 IST

कंचाड-कुर्झे रस्त्यालगतच्या ब्राह्मणगावातील मृतदेहाचे दहन स्मशानभूमीच्या ऐवजी कुर्झे देहर्जा नदीच्या पात्रात केले जात असल्यामुळे काठावर राहणारे ग्रामस्थ व मुलांमध्ये भीतीचे

मनोर : कंचाड-कुर्झे रस्त्यालगतच्या ब्राह्मणगावातील मृतदेहाचे दहन स्मशानभूमीच्या ऐवजी कुर्झे देहर्जा नदीच्या पात्रात केले जात असल्यामुळे काठावर राहणारे ग्रामस्थ व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी देखील ग्रामपंचायत व महसूलखाते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही.ब्राह्मणगावासाठी सर्व्हे नं २४ मध्ये स्वतंत्र सातबाऱ्यावर हिंदू स्मशानभूमीसाठी तीन गुंठे जमीन आहे तरी देखील ग्रामस्थ त्याचा वापर न करता जाणूनबुजून नदीकाठच्या रहिवाशांच्या घरासमोर प्रेताचे दहन करतात. त्यामुळे त्या घरामध्ये धूर जातो, रोगराई होते तसेच लहानमुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. कंचाड कुर्झे नदीवरील असलेल्या पुलावरून शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. दहन होत असलेल्या प्रेताला ते घाबरतात असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने २८/२/२०१२ रोजी किशोर दत्तात्रय शेलार, मंजिरी किशोर शेलार, कृष्णा सुतार व इतरांनी तहसीलदार वाडा यांच्याकडे याबाबत तक्रार केली परंतु त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. गेल्या २५ वर्षांपासून नदीकाठी आमचे घर आहे. त्यामध्ये मुलाबाळा सहीत राहतो. नदीच्या पलिकडील तीरावर ब्राह्मणगाव आहे. तेथील दिलीप मुकुंद पाटील, नागेश पाटील, कल्पेश पाटील, सदानंद पाटील हर्षद एस पाटील व इतरांनी जाणूनबुजून त्रास देण्यासाठी कै. काळु भगत यांच्या पार्थिवाचे दहन घरासमोर जाळले याची माहिती दिली होती. तिचीही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यापूर्वी १९/११/२०११ रोजी प्रदीप माने यांनी केलेल्या तक्रारीची त्यावेळेच्या वाड्याच्या तहसीलदारांनी दखल घेऊन सर्व्हे नं २४ मध्ये स्मशानभूमी बांधून त्या ठिकाणीच प्रेतांचे दहन करा, नदीच्या पात्रात करू नका असे आदेश ग्रुपग्रामपंचायत आंबिवली ब्राह्मणगाव यांना दिले होते तरी सुद्धा जैसे थे परिस्थिती आहे, न्याय मिळत नाही म्हणून शेलार कुटुंबिय व काही रहिवाशांनी प्रथम हायकोर्टात व नंतर सिव्हील कोर्ट भिवंडी येथे एस.सी.न. ५५६/२०१३ मध्ये शासन व काही समाजकंटकाविरुद्ध दावा दाखल केला असून तो न्यायप्रविष्ट आहे, तरीही त्याला न जुमानता प्रेताचे दहन केले जाते आहे.