शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

By admin | Updated: May 3, 2016 00:38 IST

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल

- वसंत भोईर,  वाडा

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता. कौलारु घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य आपल्याला गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते. हे दोन भागात विभागले आहे, गाव आणि कोठी.हे गाव इतर गावांसारखेच. पण या गावाने आपल्या पोटात सामावून घेतला आहे पेशव्यांचा इतिहास. या गावाने अनुभवला आहे चिमाजी आप्पांचा सहवास. गावाने ऐकले आहेत चिमाजी आप्पांनी सैन्याला व सरदारांना दिलेले आदेश आणि मुख्य म्हणजे चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो सुद्धा याच गावात. काळाच्या ओघात गावकरी गुंज गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि चिमाजी आप्पांना विसरले असतील, पण गावात असलेले पेशवेकालीन परशुराम उर्फ भार्गवरामाचे मंदिर, डोंगराच्या पायथ्याशी असलेले तळे व त्याच्या काठावरती असलेले मंदिराचे भग्न अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने चिमाजी आप्पांचा इतिहास अजूनही जिवंत आहे. गावातील या पार्श्वभूमीचा गावकऱ्यांनी पर्यटन व त्यातून अर्थार्जनासाठी वापर केल्यास येथील आर्थिक परिस्थिीती सुधारुन गावकऱ्यांना उपजिवीका मिळेल. (वार्ताहर)भार्गव अर्थात परशुराम मंदिरगुंज गावात असलेले भार्गवरामाचे मंदिर एक टेकडीवर असल्यामूळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते. गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला भार्गवरामाच्या मंदिरात आपल्याला घेऊन जाते. हा तलाव आॅक्टोबर-जानेवारीमध्ये कमळासारख्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. पण ही कमळाची फुले नसून ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले आहेत.फुलांचे हे सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि आणि कोरीवकाम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने आपले पाऊले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून हे मंदिर १३ व्या शतकातील वाटते.भार्गवराम मंदिर एका टेकडीवर असून मंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. भार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभा दगडात बांधले आहे. मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करते. मंदिराजवळून दिसणारे १५ ते २० घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य फार सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यमुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानफुले दृष्टीस पडतात.