शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

By admin | Updated: May 3, 2016 00:38 IST

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल

- वसंत भोईर,  वाडा

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता. कौलारु घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य आपल्याला गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते. हे दोन भागात विभागले आहे, गाव आणि कोठी.हे गाव इतर गावांसारखेच. पण या गावाने आपल्या पोटात सामावून घेतला आहे पेशव्यांचा इतिहास. या गावाने अनुभवला आहे चिमाजी आप्पांचा सहवास. गावाने ऐकले आहेत चिमाजी आप्पांनी सैन्याला व सरदारांना दिलेले आदेश आणि मुख्य म्हणजे चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो सुद्धा याच गावात. काळाच्या ओघात गावकरी गुंज गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि चिमाजी आप्पांना विसरले असतील, पण गावात असलेले पेशवेकालीन परशुराम उर्फ भार्गवरामाचे मंदिर, डोंगराच्या पायथ्याशी असलेले तळे व त्याच्या काठावरती असलेले मंदिराचे भग्न अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने चिमाजी आप्पांचा इतिहास अजूनही जिवंत आहे. गावातील या पार्श्वभूमीचा गावकऱ्यांनी पर्यटन व त्यातून अर्थार्जनासाठी वापर केल्यास येथील आर्थिक परिस्थिीती सुधारुन गावकऱ्यांना उपजिवीका मिळेल. (वार्ताहर)भार्गव अर्थात परशुराम मंदिरगुंज गावात असलेले भार्गवरामाचे मंदिर एक टेकडीवर असल्यामूळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते. गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला भार्गवरामाच्या मंदिरात आपल्याला घेऊन जाते. हा तलाव आॅक्टोबर-जानेवारीमध्ये कमळासारख्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. पण ही कमळाची फुले नसून ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले आहेत.फुलांचे हे सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि आणि कोरीवकाम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने आपले पाऊले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून हे मंदिर १३ व्या शतकातील वाटते.भार्गवराम मंदिर एका टेकडीवर असून मंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. भार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभा दगडात बांधले आहे. मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करते. मंदिराजवळून दिसणारे १५ ते २० घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य फार सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यमुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानफुले दृष्टीस पडतात.