शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या उघड्या नाल्यातून केमिकलचे पाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:45 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : रासायनिक, औषधी कंपन्यांमुळे नदी-नाल्यांमध्ये रसायने; पर्यावरण, मानवी आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कविरार/नालासोपारा : वसई पूर्वेला केमिकल व औषध कंपन्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल सोडले जात आहे. यामुळे नागरिकांना, प्राण्यांना तसेच पर्यावरणाला देखील हानी होत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असे प्रकार सुरु असूनही पालिका प्रशासन यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

वसई पूर्वेला औषधी कंपन्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पर्यावरणासाठी ते धोकादायक ठरत आहे. या कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी पाणी नदी नाल्यांमध्ये सोडत आहेत.गल्ली आणि रस्त्याच्या किनारी असलेल्या नाल्यांमधून केमिकलयुक्त घाण पाण्यामुळे विविध आजार जोमाने पसरत आहेत. केमिकलचे पाणी छोट्या मोठ्या गटारांमधून शेतात आणि खाडीपर्यंत पोहोचत आहे. हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगाचे केमिकलचे पाणी मासे, शेती आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. काही महिन्यांपूर्वी हेच केमिकलयुक्त पाणी प्यायल्याने ७ गायींचा मृत्यू झाला होता.

या कंपन्यांमध्ये जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून या अनधिकृत कंपन्या सुरू असून याबद्दल स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही याकडे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कानाडोळा करतो आहे. स्थानिकांनी लोकमतला सांगितले की, या केमिकल कंपन्यांचे मालक कायद्याचे उल्लंघन करून कंपनीतून निघणाऱ्या कचºयाचे ढीग रस्त्यावर टाकत आहेत तर केमिकलचे पाणी गटारे, नाल्यांमधून, रस्त्यावर बिनधास्तपणे सोडून देत आहे. या केमिकलच्या उग्र वासामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत पण याचे कोणालाही काहीही सोयरसुतक नाही. या कंपन्यांमध्ये अनेकदा आग लाग्ण्याच्या घटना घडलेल्या आहेत तर या कंपन्यांमुळे वायू आणि जल प्रदूषण वाढत चालले आहे.

कंपनीतून येणाºया पाण्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे मोठे आजार पसरण्याची भीती आहे. याठिकाणी लहान मोठ्या अशा मिळून एकूण चार हजार कंपन्या आहेत तर यांच्यापैकी मोजक्या कंपन्यांकडे अधिकृत परवानगी आहे. इतर कंपन्या या अनधिकृत आहेत तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे.दरम्यान, हे विषारी पाणी शेतीमध्ये जात असल्याने शेतीत उगवणारा भाजीपाला देखील दूषित होत आहे. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वसई पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहेत. छोट्या मोठ्या मिळून अंदाजे ४ हजारपेक्षा जास्त कंपन्या सुरू आहे. यापैकी काही कंपन्यांना परवानगी नसून त्या अनधिकृतपणे सुरू आहे. काही कंपन्यांना तर अग्निशामक दलाची एनओसी पण मिळालेली नाही. कपन्यांमधून निघणारा कचरा, केमिकल आणि धुरामुळे पर्यावरणाला धोका आहे. शेतात केमिकलयुक्त पाणी शेतात गेल्याने उगवले जाणारे धान्य आणि भाजीपाला दूषित होत आहे.- राजकुमार चोरघे, ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवकरंगीबेरंगी केमिकल युक्त पाण्यामुळे सर्वत्र उग्र वास पसरला जात आहे. यामुळे डासांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आमच्या घराच्या आजूबाजूच्या नाल्यातून हे केमिकलयुक्त पाणी खाडीकडे जाते. अनेकवेळा तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नाही.- राजू पाटील, स्थानिक रहिवाशीमी नव्यानेच हजर झालो असून कंपन्यांबाबत लेखी तक्र ार आल्यावर नक्कीच चौकशी करून कारवाई करणार. तसेच याआधी कोणत्या कंपन्यांची तक्र ार आली आहे का याची माहिती घेतो.- शरद पवार,फिल्ड आॅफिसर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, ठाणेकुठे कुठेआहेत कंपन्यावसई पूर्वेकडील गोलानी, वालीव, धुमाळ नगर, वसई फाटा, खैरपाडा, चिंचपाडा, गावराई पाडा, सातीवली, भोयदापाडा, अग्रवाल नगर, कामण, चिंचोटी, मुंबई अहमदाबाद महामार्ग, रिचर्ड कंपाऊंड, वाकणपाडा, शालिमार अश्या अनेक परिसरात आजपण केमिकल कंपन्या अनधिकृतपणे सुरू आहेत. काही केमिकल कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत.