शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वसईच्या उघड्या नाल्यातून केमिकलचे पाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:45 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : रासायनिक, औषधी कंपन्यांमुळे नदी-नाल्यांमध्ये रसायने; पर्यावरण, मानवी आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कविरार/नालासोपारा : वसई पूर्वेला केमिकल व औषध कंपन्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल सोडले जात आहे. यामुळे नागरिकांना, प्राण्यांना तसेच पर्यावरणाला देखील हानी होत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असे प्रकार सुरु असूनही पालिका प्रशासन यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

वसई पूर्वेला औषधी कंपन्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पर्यावरणासाठी ते धोकादायक ठरत आहे. या कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी पाणी नदी नाल्यांमध्ये सोडत आहेत.गल्ली आणि रस्त्याच्या किनारी असलेल्या नाल्यांमधून केमिकलयुक्त घाण पाण्यामुळे विविध आजार जोमाने पसरत आहेत. केमिकलचे पाणी छोट्या मोठ्या गटारांमधून शेतात आणि खाडीपर्यंत पोहोचत आहे. हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगाचे केमिकलचे पाणी मासे, शेती आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. काही महिन्यांपूर्वी हेच केमिकलयुक्त पाणी प्यायल्याने ७ गायींचा मृत्यू झाला होता.

या कंपन्यांमध्ये जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून या अनधिकृत कंपन्या सुरू असून याबद्दल स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही याकडे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कानाडोळा करतो आहे. स्थानिकांनी लोकमतला सांगितले की, या केमिकल कंपन्यांचे मालक कायद्याचे उल्लंघन करून कंपनीतून निघणाऱ्या कचºयाचे ढीग रस्त्यावर टाकत आहेत तर केमिकलचे पाणी गटारे, नाल्यांमधून, रस्त्यावर बिनधास्तपणे सोडून देत आहे. या केमिकलच्या उग्र वासामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत पण याचे कोणालाही काहीही सोयरसुतक नाही. या कंपन्यांमध्ये अनेकदा आग लाग्ण्याच्या घटना घडलेल्या आहेत तर या कंपन्यांमुळे वायू आणि जल प्रदूषण वाढत चालले आहे.

कंपनीतून येणाºया पाण्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे मोठे आजार पसरण्याची भीती आहे. याठिकाणी लहान मोठ्या अशा मिळून एकूण चार हजार कंपन्या आहेत तर यांच्यापैकी मोजक्या कंपन्यांकडे अधिकृत परवानगी आहे. इतर कंपन्या या अनधिकृत आहेत तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे.दरम्यान, हे विषारी पाणी शेतीमध्ये जात असल्याने शेतीत उगवणारा भाजीपाला देखील दूषित होत आहे. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वसई पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहेत. छोट्या मोठ्या मिळून अंदाजे ४ हजारपेक्षा जास्त कंपन्या सुरू आहे. यापैकी काही कंपन्यांना परवानगी नसून त्या अनधिकृतपणे सुरू आहे. काही कंपन्यांना तर अग्निशामक दलाची एनओसी पण मिळालेली नाही. कपन्यांमधून निघणारा कचरा, केमिकल आणि धुरामुळे पर्यावरणाला धोका आहे. शेतात केमिकलयुक्त पाणी शेतात गेल्याने उगवले जाणारे धान्य आणि भाजीपाला दूषित होत आहे.- राजकुमार चोरघे, ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवकरंगीबेरंगी केमिकल युक्त पाण्यामुळे सर्वत्र उग्र वास पसरला जात आहे. यामुळे डासांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आमच्या घराच्या आजूबाजूच्या नाल्यातून हे केमिकलयुक्त पाणी खाडीकडे जाते. अनेकवेळा तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नाही.- राजू पाटील, स्थानिक रहिवाशीमी नव्यानेच हजर झालो असून कंपन्यांबाबत लेखी तक्र ार आल्यावर नक्कीच चौकशी करून कारवाई करणार. तसेच याआधी कोणत्या कंपन्यांची तक्र ार आली आहे का याची माहिती घेतो.- शरद पवार,फिल्ड आॅफिसर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, ठाणेकुठे कुठेआहेत कंपन्यावसई पूर्वेकडील गोलानी, वालीव, धुमाळ नगर, वसई फाटा, खैरपाडा, चिंचपाडा, गावराई पाडा, सातीवली, भोयदापाडा, अग्रवाल नगर, कामण, चिंचोटी, मुंबई अहमदाबाद महामार्ग, रिचर्ड कंपाऊंड, वाकणपाडा, शालिमार अश्या अनेक परिसरात आजपण केमिकल कंपन्या अनधिकृतपणे सुरू आहेत. काही केमिकल कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत.