शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:50 IST

समुद्रात वादळीवारे; पावसाळी बंदी कालावधी वाढवण्याची मागणी

- हितेन नाईकपालघर : मासेमारीच्या सुरुवातीलाच समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भरसमुद्रातून मच्छीमारांना माघारी परतावे लागले आहे. दुसरीकडे नौका खडकावर आढळून फुटण्याचे, मच्छीमार समुद्रात बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकारही घडल्याने या बदलत्या व धोकादायक वातावरणात मच्छीमारांना समुद्रात लोटण्याऐवजी सुधारित आदेश काढून पावसाळी बंदी कालावधी वाढवूूून १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा करण्याची मागणी केली जात आहे.जून महिन्यापासून सुरू होणाºया पावसामुळे समुद्रातील वातावरण धोकादायक बनल्याने व माश्यांच्या पिल्लांच्या वाढीला पुरेसा अवधी मिळावा यासाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित केला जातो. पूर्वी १ जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा बंदी कालावधी जाहीर केला जात असे. मात्र भांडवलशाही मच्छीमारांच्या दबावाखाली येत मत्स्यव्यवसाय विभागातील आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना चुकीची माहिती पुरवीत पावसाळी बंदी कालावधी घटवल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे हा बंदी कालावधी कमी करून तो सध्या १ जून ते ३१ जुलै असा कमी करण्यात आला आहे. मागील ३-४ वर्षांपासून पावसाळ्याचा कालावधी वाढला असून आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस कोसळू लागल्याने मासेमारी करण्याचा कालावधी घटत चालला आहे.जून ते आॅगस्ट या तीन महिन्यात समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा असे धोकादायक बनलेले वातावरण त्यानंतर शांत होणे अपेक्षित असले तरी पावसाला उशिराने सुरुवात होऊन अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत असल्याने या बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. मे महिन्यात निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर धडका दिल्याने मच्छीमारांना मागे परतावे लागले होते.समुद्रातील मत्स्यसाठे टिकवण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावासमुद्रातील वातावरण ढवळून निघाले असल्याचे मत जुने जाणते क्रियाशील मच्छीमार सुभाष तामोरे व्यक्त करीत असून समुद्रातील मत्स्यसाठे टिकवून ठेवण्यासाठी पावसाळी बंदी कालावधीमध्ये शासनाने वाढ करावी, असे सांगत आहेत.बंदी कालावधीत मच्छीमार आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणाºया मत्स्य विक्रेत्यांना शासनाने एक पॅकेज दिल्यास मत्स्य उत्पादन वाढीला उत्तेजन मिळू शकणार आहे.मच्छीमारीसाठी येणाºया ३ ते ४ हजार आदिवासी खलाशांना आपल्या शेतीची कामे करण्याचा पुरेसा कालावधीही मिळणार असून मत्स्य उत्पादन वाढून मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मच्छीमारांची अनेक वर्षांपासूनची ओरड आपोआप मागे पडणार आहे.१ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर २ आॅगस्ट रोजी समुद्रात मासेमारीला गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाच्या तडाख्याने गोराई (बोरिवली), उत्तन, चौक, सातपाटी येथील तीन बोटी समुद्रात बुडाल्या होत्या. या घटनेत अनेक मच्छीमारांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, तर तीन मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.

टॅग्स :fishermanमच्छीमार