शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:50 IST

समुद्रात वादळीवारे; पावसाळी बंदी कालावधी वाढवण्याची मागणी

- हितेन नाईकपालघर : मासेमारीच्या सुरुवातीलाच समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भरसमुद्रातून मच्छीमारांना माघारी परतावे लागले आहे. दुसरीकडे नौका खडकावर आढळून फुटण्याचे, मच्छीमार समुद्रात बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकारही घडल्याने या बदलत्या व धोकादायक वातावरणात मच्छीमारांना समुद्रात लोटण्याऐवजी सुधारित आदेश काढून पावसाळी बंदी कालावधी वाढवूूून १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा करण्याची मागणी केली जात आहे.जून महिन्यापासून सुरू होणाºया पावसामुळे समुद्रातील वातावरण धोकादायक बनल्याने व माश्यांच्या पिल्लांच्या वाढीला पुरेसा अवधी मिळावा यासाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित केला जातो. पूर्वी १ जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा बंदी कालावधी जाहीर केला जात असे. मात्र भांडवलशाही मच्छीमारांच्या दबावाखाली येत मत्स्यव्यवसाय विभागातील आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना चुकीची माहिती पुरवीत पावसाळी बंदी कालावधी घटवल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे हा बंदी कालावधी कमी करून तो सध्या १ जून ते ३१ जुलै असा कमी करण्यात आला आहे. मागील ३-४ वर्षांपासून पावसाळ्याचा कालावधी वाढला असून आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस कोसळू लागल्याने मासेमारी करण्याचा कालावधी घटत चालला आहे.जून ते आॅगस्ट या तीन महिन्यात समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा असे धोकादायक बनलेले वातावरण त्यानंतर शांत होणे अपेक्षित असले तरी पावसाला उशिराने सुरुवात होऊन अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत असल्याने या बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. मे महिन्यात निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर धडका दिल्याने मच्छीमारांना मागे परतावे लागले होते.समुद्रातील मत्स्यसाठे टिकवण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावासमुद्रातील वातावरण ढवळून निघाले असल्याचे मत जुने जाणते क्रियाशील मच्छीमार सुभाष तामोरे व्यक्त करीत असून समुद्रातील मत्स्यसाठे टिकवून ठेवण्यासाठी पावसाळी बंदी कालावधीमध्ये शासनाने वाढ करावी, असे सांगत आहेत.बंदी कालावधीत मच्छीमार आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणाºया मत्स्य विक्रेत्यांना शासनाने एक पॅकेज दिल्यास मत्स्य उत्पादन वाढीला उत्तेजन मिळू शकणार आहे.मच्छीमारीसाठी येणाºया ३ ते ४ हजार आदिवासी खलाशांना आपल्या शेतीची कामे करण्याचा पुरेसा कालावधीही मिळणार असून मत्स्य उत्पादन वाढून मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मच्छीमारांची अनेक वर्षांपासूनची ओरड आपोआप मागे पडणार आहे.१ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर २ आॅगस्ट रोजी समुद्रात मासेमारीला गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाच्या तडाख्याने गोराई (बोरिवली), उत्तन, चौक, सातपाटी येथील तीन बोटी समुद्रात बुडाल्या होत्या. या घटनेत अनेक मच्छीमारांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, तर तीन मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.

टॅग्स :fishermanमच्छीमार