शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जव्हार येथे जगदंबा उत्सव (बोहाडा) उत्साहात साजरा

By admin | Updated: May 3, 2016 00:31 IST

शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच

- हुसेन मेमन, जव्हार

शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच धर्मिक नाळ असलेला हा उत्सव राज्याच्या प्रत्येक आदिवासीबहुल भागात साजरा केला जातो. पालघर हा आदिवासी जिल्हाच असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ९९ टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यांत विविध गावपाड्यांत सुद्धा जगदंबा उत्सव आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला, परंपरा, व संस्कृतीचे शेकडो वर्षांची परंपरा जपली जाते.दरवर्षीप्रमाणे जव्हार शहरात २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जगदंबा उत्सव साजरा केला गेला. रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो. विविध देवदेवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपारिक वाद्य सांबळच्या तालावर एका विशिष्टि पद्धतीने ही सोंग नाचविली जातात. या वेळी अनेक लोक आपले गाऱ्हाणे मांडत असतात. कार्यकर्ते हातात काठीला कापड बांधून तयार केलल्या टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यंत नाचविली जातात. देवदेवतांचे युद्ध, हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंगे हे बोहाड्याचे प्रमुख आकर्षण असते. जव्हार येथील जगदंबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी गजाननाचे विधिवत पूजन करून व मिरवणूक अर्थात थाप रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत, दुसऱ्यादिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी १ मे या महाराष्ट्रदिनी मोठा बोहाडा रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तर दि. २ मे रोजी देवीची महापूजा सकाळ ९ वाजता होऊन त्यानंतर शहरातून महिषासूर व देवीचे युद्ध, मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली. या जगदंबा देवीला आरती ओवाळून, नारळ फोडून तसेच बोललेला नवस फेडून देवीच्या सोंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.दि. १ मे रोजी रात्री ९ वाजेपासून गणपती, शारदा, मारूती, नारदमुनी, कमलादेवी, सटवाई, एकादशी, महादेव, विष्णू, वाघ, पवनदेव, ब्रम्हदेव, कृष्ण, साई, अग्नीदेव, भैरोबा, खंडेराय, भस्मासूर, राम-लक्ष्मण, हेडींबा, रावण, नरसिंह, चंद्रदेव, सूर्यदेव, महीषासूर आदी २८ प्रकारची सोंगे सकाळी ९ वाजेपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर श्री जगदंबा व महिषासूर यांचे युद्ध होऊन महिषासूराचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणूक निघाली.