शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

जव्हार येथे जगदंबा उत्सव (बोहाडा) उत्साहात साजरा

By admin | Updated: May 3, 2016 00:31 IST

शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच

- हुसेन मेमन, जव्हार

शेकडो वर्षांची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा उत्सव अर्थात बोहाडा जव्हार शहरात उत्साहात साजरा झाला. बोहाडा हा आदिवासी समाजाचा अविभाज्य, उत्सव, सणाबरोबरच धर्मिक नाळ असलेला हा उत्सव राज्याच्या प्रत्येक आदिवासीबहुल भागात साजरा केला जातो. पालघर हा आदिवासी जिल्हाच असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ९९ टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यांत विविध गावपाड्यांत सुद्धा जगदंबा उत्सव आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला, परंपरा, व संस्कृतीचे शेकडो वर्षांची परंपरा जपली जाते.दरवर्षीप्रमाणे जव्हार शहरात २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जगदंबा उत्सव साजरा केला गेला. रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो. विविध देवदेवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासींचे पारंपारिक वाद्य सांबळच्या तालावर एका विशिष्टि पद्धतीने ही सोंग नाचविली जातात. या वेळी अनेक लोक आपले गाऱ्हाणे मांडत असतात. कार्यकर्ते हातात काठीला कापड बांधून तयार केलल्या टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यंत नाचविली जातात. देवदेवतांचे युद्ध, हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंगे हे बोहाड्याचे प्रमुख आकर्षण असते. जव्हार येथील जगदंबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी गजाननाचे विधिवत पूजन करून व मिरवणूक अर्थात थाप रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत, दुसऱ्यादिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी १ मे या महाराष्ट्रदिनी मोठा बोहाडा रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तर दि. २ मे रोजी देवीची महापूजा सकाळ ९ वाजता होऊन त्यानंतर शहरातून महिषासूर व देवीचे युद्ध, मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता झाली. या जगदंबा देवीला आरती ओवाळून, नारळ फोडून तसेच बोललेला नवस फेडून देवीच्या सोंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.दि. १ मे रोजी रात्री ९ वाजेपासून गणपती, शारदा, मारूती, नारदमुनी, कमलादेवी, सटवाई, एकादशी, महादेव, विष्णू, वाघ, पवनदेव, ब्रम्हदेव, कृष्ण, साई, अग्नीदेव, भैरोबा, खंडेराय, भस्मासूर, राम-लक्ष्मण, हेडींबा, रावण, नरसिंह, चंद्रदेव, सूर्यदेव, महीषासूर आदी २८ प्रकारची सोंगे सकाळी ९ वाजेपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर श्री जगदंबा व महिषासूर यांचे युद्ध होऊन महिषासूराचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणूक निघाली.