शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

बुजडपाडा जि.प. शाळा पहिली आयएसओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:43 IST

बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले.

- अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : २६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी डहाणू तालुक्यातील जि.प. कोटबी बुजडपाडा या शाळेने आयएसओ मानांकनाचे निकष पूर्ण करून पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने नाव कोरले. विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षण विभागाचे पदाधिकारी आणि विविध संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने शाळेला हा गौरव प्राप्त झाला. ही कृतज्ञता शाळा प्रशासनाने आजही जपली आहे.कोटबी या आदिवासी गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक बुजडपाडा शाळा असून तिची स्थापना ४ मार्च १९५७ साली झाली. प्रारंभी इयत्ता ४, त्यानंतर ७ वी आणि आठवी इयत्ता निर्माण करून टप्प्या-टप्प्याने शाळेचे विस्तारीकरण शिक्षकांच्या प्रयत्नाने झाले. मात्र गावात कायमस्वरूपी रोजगार संधीच्या अभावी पावसाळा संपताच स्थानिकांचे स्थलांतर सुरू व्हायचे आणि त्याच्यापाठोपाठ त्यांची मुलेही जाऊ लागल्याने या शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले. यावर तोडगा म्हणून शाळेने वसतीगृह सुरू केले. एवढ्यावरच न थांबता मुंबईस्थित सामाजिक संस्थांच्या मदतीने महिलांकरिता लघुद्योग सुरू केल्याने गळती थांबली.दरम्यान, शाळा आयएसओ करावी अशी संकल्पना तत्कालीन केंद्रप्रमुख जयश्री राऊत यांनी मांडली. मुख्याध्यापक सुनील देशमुख आणि शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हा प्रवास सुरू झाला.>शालेय उपक्र मवसतिगृह, लघुउद्योग आदी उपक्रमांच्या माध्यमातून पालकांच्या हाताला काम देऊन पणत्या, आकाशकंदील, राख्या इ. निर्मिती, परसबाग, शाळेतील मदतनीस स्वयंपाकगृहात अ‍ॅपरण आणि ड्रेसकोड घालून काम, शाळेशी संबंधित सर्वांना ओळखपत्र, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सुविधा.>आयएसओ शाळा निकष पूर्ण करण्याचा निश्चय केल्यानंतर शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या बाबीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. राज्य आणि जिल्हास्तरावरून अधिकारी तसेच शिक्षणप्रेमी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त करतात. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्वतयारीचे वर्ग घेण्याचा मानस आहे.- सुनील देशमुख मुख्याध्यापक,जि.प. शाळा कोटबी बुजडपाडा>विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली२०१४ साली एनजीओच्या माध्यमातून स्टेशनरी, दफ्तर, सायकली यांचा लाभ मिळू लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली.