शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:40 IST

विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

विरार : विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलाला भेगा पडल्या असून प्रवाशांसाठी हा पूल धोकादायक बनत चालला आहे. मात्र, गावकऱ्यांना प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे.विरार महामार्गावरून काही अंतरावर असलेले भाताणे गाव हे अनेक वर्षांपासून धोक्याचा प्रवास करत आहेत. या गावात जाण्यासाठी मध्ये मोठी नदी पार करावी लागते. तर नदी पार करण्यासाठी बांधलेला पूल हा दिवसेंदिवस धोकादायक बनत असून पर्याय नसल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथूनच प्रवास करावा लागत आहे.दर वर्षी पावसाळ्यात नदीत पाण्याची पातळी वाढल्यावर पूल पाण्याखाली जातो आणि गावकºयांचा संपर्क तुटतो. अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम कमकुवत होते आहे. पुलाला भेगा पडल्या असून पुलाच्या सळ्यादेखील बाहेर येत आहेत. तसेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेकदा दुचाकीस्वार यामुळे पडले आहेत. या गावात पर्यटन स्थळे तसेच अनेक आश्रम असल्याने पुलावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच या पुलावरून अवजड वाहने देखील जात असल्याने पुलाची अवस्था अधिकाधिक बिकट होत आहे.पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने नदीमधील कचरा पुलाच्या कडेला अडकलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरते आहे. गावकºयांनी अनेकदा प्रशासनाला तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. पूल असलेल्या नदीत मगरी तसेच पूल कोसळण्याची भीती असल्याने सरस्वती नदी सारखी परिस्थिती उद्भवू नये अशी काळजी गावकºयांना वाटत आहे. पावसाळ्यात या पुलामुळे गावकºयांचे हाल होतात. यामुळे या पुलाची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.येत्या आठवड्याभरात पुलाची दुरुस्ती करण्यात येईल. लवकरच काम पूर्ण करू. गावकºयांना प्रवासासाठी हा एकच पूल असल्याने योग्यवेळ पाहून याची दुरुस्ती करण्यात येईल. तर पावसाळ्यानंतर नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होईल. - पी. आर. चव्हाण, कार्यकारी अभियंता, पी.डब्लू.डी.‘‘प्रशासनाला अनेकदा पुलाची दुरु स्ती करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच मदत झालेली नाही.’’- ज्योतोबा शेळके, सामान्य नागरिक‘प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे. प्रशासन पाहणी देखील करून जात नाही. प्रवासासाठी दुसरा मार्ग नसल्याने या पुलाचा वापर करावा लागतो.’- विलास परु ळेकर, सामान्य नागरिक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार