शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:40 IST

विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

विरार : विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलाला भेगा पडल्या असून प्रवाशांसाठी हा पूल धोकादायक बनत चालला आहे. मात्र, गावकऱ्यांना प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे.विरार महामार्गावरून काही अंतरावर असलेले भाताणे गाव हे अनेक वर्षांपासून धोक्याचा प्रवास करत आहेत. या गावात जाण्यासाठी मध्ये मोठी नदी पार करावी लागते. तर नदी पार करण्यासाठी बांधलेला पूल हा दिवसेंदिवस धोकादायक बनत असून पर्याय नसल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथूनच प्रवास करावा लागत आहे.दर वर्षी पावसाळ्यात नदीत पाण्याची पातळी वाढल्यावर पूल पाण्याखाली जातो आणि गावकºयांचा संपर्क तुटतो. अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम कमकुवत होते आहे. पुलाला भेगा पडल्या असून पुलाच्या सळ्यादेखील बाहेर येत आहेत. तसेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेकदा दुचाकीस्वार यामुळे पडले आहेत. या गावात पर्यटन स्थळे तसेच अनेक आश्रम असल्याने पुलावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच या पुलावरून अवजड वाहने देखील जात असल्याने पुलाची अवस्था अधिकाधिक बिकट होत आहे.पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने नदीमधील कचरा पुलाच्या कडेला अडकलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरते आहे. गावकºयांनी अनेकदा प्रशासनाला तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. पूल असलेल्या नदीत मगरी तसेच पूल कोसळण्याची भीती असल्याने सरस्वती नदी सारखी परिस्थिती उद्भवू नये अशी काळजी गावकºयांना वाटत आहे. पावसाळ्यात या पुलामुळे गावकºयांचे हाल होतात. यामुळे या पुलाची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.येत्या आठवड्याभरात पुलाची दुरुस्ती करण्यात येईल. लवकरच काम पूर्ण करू. गावकºयांना प्रवासासाठी हा एकच पूल असल्याने योग्यवेळ पाहून याची दुरुस्ती करण्यात येईल. तर पावसाळ्यानंतर नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होईल. - पी. आर. चव्हाण, कार्यकारी अभियंता, पी.डब्लू.डी.‘‘प्रशासनाला अनेकदा पुलाची दुरु स्ती करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच मदत झालेली नाही.’’- ज्योतोबा शेळके, सामान्य नागरिक‘प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे. प्रशासन पाहणी देखील करून जात नाही. प्रवासासाठी दुसरा मार्ग नसल्याने या पुलाचा वापर करावा लागतो.’- विलास परु ळेकर, सामान्य नागरिक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार