शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

कोसबाडचे विभाजन मंजूरीच्या प्रतिक्षेत,१९९५ पासून निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:19 IST

तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

शौकत शेख डहाणू : तालुक्यातील २९ पाडे असलेल्या कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेसाठी ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सातत्याने पाठपुरावा करुन तसेच १९९५ पासून निवडणुकांवर बहिष्कार टाकून सुद्धा सरकारचे दुर्लक्ष आहे.

२०१९ मध्ये या मागणीस पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेने मान्यता देऊन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याची कोणतीही दाद शासन दरबारी घेतली जात नाही. मात्र चंदा घोरखाना या २५ वर्षाच्या महिलेने मतदान करु न बहिष्कार मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. डहाणू तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या १०,१८५ इतकी असून ग्रामपंचायतीमध्ये दोन महसूल गावे समाविष्ट आहेत. त्यापैकी कैनाड गावची लोकसंख्या ५,७०६ व कोसबाड गावची लोकसंख्या ४,४७९ आहे. दोन्ही गावातील अंतर सुमारे सात ते आठ किमी आहे. त्यामुळे कोसबाड गावातील ग्रामस्थांना कैनाड ग्रामपंचायतीमध्ये कामा निमित्त डोंगरावरून पायपीट करत किंवा सात ते आठ किमी डोंगराला वळसा घालून यावे लागते.

१९५२ साली ग्रामपंचायत अस्तित्वात आली तर ग्रामपंचायतीची मुदत १८ जुलै २०२१ पर्यंत आहे. त्या अनुषंगाने कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोसबाड ही नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी सभागृहात ठराव घेण्यात आला आहे. २००९ साली दीपक रु पजी ढाक हे सरपंच असतानाआमच्याकडून २००९ ला अधिकृत फाईल पाठवण्यात आली त्यात वेळोवेळी तांत्रिक दुरुस्त्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी डहाणू तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोसबाड स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावी याबाबत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पालघर विभागात प्रस्ताव सादर केलेला आहे. दोन्ही गावतील अंतर व दुर्गमता पाहुन त्यावर निर्णय होण्याची मागणी होत आहे.

ग्रामसभेचा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव घेऊन सुद्धा नाकारण्यात आली. शेवटी २०१५ साली विशेष ग्रामसभेचा ठराव घेतला. आणि त्या सभेला तत्कालीन तहसीलदार, बीडीवो उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतीत ग्रामस्थांनी जाहीर केले की, जो पर्यंत आमची ग्रामपंचायत स्वतंत्र होत नाही तो पर्यंत आगामी प्रत्येक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. -उमेश ढाक, ग्रामस्थ

कोसबाड ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव जानेवारी महीन्यात पंचायत समितीने जिल्हापरिषदेकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा परिषेकडून ठराव घेऊन प्रस्ताव कमिशनर ऑफिसला जातो. कमिशनर ऑफिसकडून तो शासनाकडे प्रस्तावित होतो. ही प्रक्र ीया सुरु असून त्यावर लवकरच निर्णय होईल. -बी. एच. भरक्षे गट विकास अधीकारी डहाणू

कैनाड ग्रामपंचायत विभाजनाबाबत प्रस्ताव डहाणू गट विकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. - राहुल सारंग, तहसीलदार डहाणू

टॅग्स :Electionनिवडणूकpalgharपालघर