शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अग्निशमन सप्ताहात बोळिंजला प्रात्यक्षिके

By admin | Updated: April 19, 2016 01:34 IST

अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

विरार : अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात एका दुर्घटनेप्रसंगी बचाव कार्य करताना अग्नीशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले होते. त्यामुळे १४ एप्रिल ते २० एप्रिल संपूर्ण •भारतात अग्नीशमन सेवा सप्ताह पाळला जातो. या सप्ताहानिमित्त वसई-विरार महापालिका अग्नीशमन दलातर्फेही जनतेचे प्रबोधन आणि जनजागृती करून आपातकालिन परिस्थितीत नागरिकांनी स्वत:सह इतरांचे प्राण कसे वाचवायचे? याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली जात आहे. सध्या अग्नीशमन दलाकडे ४० मीटर उंचीपर्यंतच्या म्हणजे १४ मजल्यांपर्यतच्या शिड्या आहेत. त्यांचा वापर उंच इमारतींना लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी चांगल्या प्रकारे होईल. आग प्रतिबंधक चांगल्या दर्जाचा गणवेश, हेल्मेट व्हॅन, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, वॉटर टँकर, आदी साधनसामुग्री आहेत. वसई-विरारमध्ये कुठेही आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे अग्नीशमन दल सक्षम आहे. अत्याधुनिक यंत्रणा या दलाकडे आहे.•भूकंप झाल्यास मोठी दुर्घटना घडल्यास, इमारत कोसळल्यास, झाडातील मांजात पक्षी अडकल्यास आदींवर मात करण्यासाठी वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल नेहमीच तत्पर असते. त्यासाठी जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते.अग्नीशमन दल केवळ आग विझवत नाही तर आगीच्या घटना घडू नये यासाठीही जनजागृती करते. नव्याने येणारे कारखाने, कंपन्या, इमारती, कार्यालये, उद्योग, व्यवसाय आगीच्या दृष्टीने सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.गणवेश आणि यंत्रसामुग्रीबाबत महापालिका, प्रशासन, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कायम सकारात्मकता दाखवली आहे. वसई-विरार महापालिका अग्नीशमन दल हे मनुष्यबळ, कर्तृत्त्व, कौशल्य आणि यंत्रणा याबाबत नेहमीच वरचढ आहे. कर्मचारी, अधिकारी यांची कमतरता नाही. अग्निशमन सप्ताहात सेवांची माहिती व जनजागृती करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आग लागल्यावर आधी काय करावे, काय दक्षता घ्यावी, फायरब्रिगेड येईपर्यंत कोणते उपाय करावेत, अशी माहिती नागरिकांना दिली जात आहे. (प्रतिनिधी)