शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दोन मुलांचे मृतदेह किनाऱ्यावरच पुरले, आपत्ती व्यवस्थापनाकडे कर्मचारी नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 05:47 IST

तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती.

पालघर : तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती. त्यातील दीपक आणि तुषारचा शोध सोमवारी लागला होता. मंगळवारी दुपारी श्रीतेजचा मृतदेह वडराईला, तर दीपेशचा मृतदेह संध्याकाळी दादरा पाड्याच्या किनाºयावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या मुलांचा शोध वेळीच न लागल्याने, त्यांच्या कुटुंबीयांना किनाºयावरच दोघांची प्रेते पुरावी लागली.केळवे पोलीस स्थानिकांच्या मदतीने दिवसरात्र त्यांचा घेत होते. मात्र, अपुºया व्यवस्थेमुळे त्यांचा शोध घेण्यात अपयश आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, तरी वसई-विरारच्या अग्निशामक दलाचे दोन जवान फक्त हातात बॅटरी घेऊन मुलांचा शोध घेत होते. या व्यतिरिक्त या विभागाने कुठलीही यंत्रणा उभी केलेली नव्हती. माझ्याकडे स्टाफच नसल्याने मी काय करू, असे आपत्ती विभागाचे प्रमुख कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.घटनेच्या दिवशी तहसीलदार महेश सागर यांच्या भेटी व्यतिरिक्त एकही अधिकारी, लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नसल्याने, स्थानिकांमधून संतप्त नाराजी व्यक्त केली जात आहे. सहा.पो.नी.काळे हे सागर गोवारी, मंगेश वळवी, राजू मेहेर, सुरेश पडवळे, जगदीश पडवळे, ज्ञानेश्वर सुतार, संगम गोवारी, राजेश मोरे आदी स्थानिक मच्छीमारांच्या टीमच्या सहकार्याने शोध घेत होते. कोस्टगार्ड दमणकडून चेतक हेलिकॉप्टर आणि त्यांची बोट बुडालेल्या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती कोस्ट गार्डचे अधिकारी देत असले, तरी घटनेपासून सोमवारपर्यंत असे कुठलेही हेलीकॉप्टर अथवा बोट केळवे किनारपट्टीजवळ कुठेही दिसली नसल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.