शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:42 IST

निधी मिळाला नसल्याचे कारण, यामुळे प्रत्येक गावातील पाड्यांची संख्या लक्षात घेता एक तरी नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायतमध्ये तवा, कोल्हान, धामटणे, पेठ या चार महसूल गावांचा समावेश होत असून त्यांची लोकसंख्या चार हजारहून जास्त असून सुमारे २५ पाड्यांचा समावेश होतो. मात्र येथील प्रत्येक गावात एक अशा १० वर्षांपूर्वी बांधलेल्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर नदीकाठी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

तवा ग्रामपंचायत हद्दीतील तवा, कोल्हाण, पेठ, धामटणे या चारही गावांतील स्मशानभूमीचे पत्रे उडून दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यापेक्षा नदीकाठी खडकावर पार पाडावे लागत आहेत. तवा ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी व नवीन स्मशानभूमी बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले.२००९-१० दरम्यान तवा ग्रामपंचायतीच्या चार गावांसाठी तवा, कोल्हाण, पेठ, धामटणे येथे स्मशानभूमी बांधण्यात आलेल्या आहेत, मात्र वादळवाऱ्यामुळे स्मशानभूमीचे छप्पर उडाल्याने दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रत्येक गावातील पाड्यांची संख्या लक्षात घेता एक तरी नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.‘गिरीजमधील हिंदू स्मशानभूमी शेडची दुरुस्ती करा!’विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील प्रभाग समिती ‘आय’ मधील गिरीज चौधरीवाडी येथील हिंदू स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती करण्याबाबत बहुजन विकास आघाडीचे ग्रामीण युवाध्यक्ष आशीष राऊत यांनी प्रभाग समितीकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यविधीवेळी येथील नागरिकांना खूप त्रास सोसावा लागतो. रात्रीच्या वेळीस अंत्यविधी वेळी येथील वीज चालू होत नसल्याने नागरिकांना अंधारात विधी उरकावा लागतो. स्मशानात पाण्याची व्यवस्था नसल्याने महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्याची मागणी या निवेदनाद्वारे युवाध्यक्ष आशीष राऊत यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.तवा ग्रामपंचायतीच्या चारही स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी जनसुविधा विकास निधीसाठी एक वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु हा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. २०२०-२१ साठी जनसुविधा निधी देण्याचे मान्य केले आहे. - लतिका लहू बालशी, सरपंच, तवा ग्रामपंचायत

टॅग्स :Vasai Virarवसई विरार