शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

भार्इंदरला लवकरच मिळणार ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणी

By admin | Updated: October 28, 2015 23:08 IST

शहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला

राजू काळे, भार्इंदरशहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणीपुरवठा शासनाकडून मंजूर होण्याची शक्यता पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली असून गतवेळच्या जनगणनेनुसार यंदाच्या लोकसंख्येत सुमारे ४० ते ५० टक्यांची वाढ गेल्या १० वर्षांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रती वर्षी सरासरी ५० ते ६० हजारांने लोकसंख्या वाढत असून शहराकडे स्वत:चा जलस्त्रोत नसल्याने या वाढत्या लोकसंख्येला आजमितीस स्टेम कंपनीकडून ३० व एमआयडीसीकडून १०६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होत आहे. तो प्रती माणसामागे सुमारे १०० लीटर दररोज असून तो इतर प्रमुख महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरातील पाणीसमस्या मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर कोट्यातील १०० एमएलडी पाण्यातून २० एमएलडी पाणी तातडीने दिले आहे. तर उर्वरीत पुरवठ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रीया युती सरकारने पूर्ण करून ७५ एमएलडी पाणी दिले. पाण्याची नितांत गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी येत्या काही महिन्यांच्या काळात शहराला १०० ते १२५ एमएलडी पाणी देणार असल्याचे सुतोवाच मीरारोड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात केले होते. हे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण प्रशासनाने अतिरीक्त २५ एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून शहराला ७५ ऐवजी थेट १०० एमएलडी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या २६९ कोटींच्या ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची प्रक्रीया सुरु असून ते शहराला मिळण्यास सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावेळीही झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरासाठी तो काहीसा दिलासा देणारा असला तरी तो अपुराच ठरणार असल्याचे मत काही जलतज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले की, शहराला ७५ एमएलडी पाणी मिळणारच आहे. परंतु, अतिरीक्त २५ एमएलडी पाणी शहराला मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.