शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

भार्इंदरला लवकरच मिळणार ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणी

By admin | Updated: October 28, 2015 23:08 IST

शहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला

राजू काळे, भार्इंदरशहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणीपुरवठा शासनाकडून मंजूर होण्याची शक्यता पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली असून गतवेळच्या जनगणनेनुसार यंदाच्या लोकसंख्येत सुमारे ४० ते ५० टक्यांची वाढ गेल्या १० वर्षांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रती वर्षी सरासरी ५० ते ६० हजारांने लोकसंख्या वाढत असून शहराकडे स्वत:चा जलस्त्रोत नसल्याने या वाढत्या लोकसंख्येला आजमितीस स्टेम कंपनीकडून ३० व एमआयडीसीकडून १०६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होत आहे. तो प्रती माणसामागे सुमारे १०० लीटर दररोज असून तो इतर प्रमुख महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरातील पाणीसमस्या मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर कोट्यातील १०० एमएलडी पाण्यातून २० एमएलडी पाणी तातडीने दिले आहे. तर उर्वरीत पुरवठ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रीया युती सरकारने पूर्ण करून ७५ एमएलडी पाणी दिले. पाण्याची नितांत गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी येत्या काही महिन्यांच्या काळात शहराला १०० ते १२५ एमएलडी पाणी देणार असल्याचे सुतोवाच मीरारोड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात केले होते. हे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण प्रशासनाने अतिरीक्त २५ एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून शहराला ७५ ऐवजी थेट १०० एमएलडी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या २६९ कोटींच्या ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची प्रक्रीया सुरु असून ते शहराला मिळण्यास सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावेळीही झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरासाठी तो काहीसा दिलासा देणारा असला तरी तो अपुराच ठरणार असल्याचे मत काही जलतज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले की, शहराला ७५ एमएलडी पाणी मिळणारच आहे. परंतु, अतिरीक्त २५ एमएलडी पाणी शहराला मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.