शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भार्इंदरला लवकरच मिळणार ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणी

By admin | Updated: October 28, 2015 23:08 IST

शहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला

राजू काळे, भार्इंदरशहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणीपुरवठा शासनाकडून मंजूर होण्याची शक्यता पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली असून गतवेळच्या जनगणनेनुसार यंदाच्या लोकसंख्येत सुमारे ४० ते ५० टक्यांची वाढ गेल्या १० वर्षांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रती वर्षी सरासरी ५० ते ६० हजारांने लोकसंख्या वाढत असून शहराकडे स्वत:चा जलस्त्रोत नसल्याने या वाढत्या लोकसंख्येला आजमितीस स्टेम कंपनीकडून ३० व एमआयडीसीकडून १०६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होत आहे. तो प्रती माणसामागे सुमारे १०० लीटर दररोज असून तो इतर प्रमुख महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरातील पाणीसमस्या मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर कोट्यातील १०० एमएलडी पाण्यातून २० एमएलडी पाणी तातडीने दिले आहे. तर उर्वरीत पुरवठ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रीया युती सरकारने पूर्ण करून ७५ एमएलडी पाणी दिले. पाण्याची नितांत गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी येत्या काही महिन्यांच्या काळात शहराला १०० ते १२५ एमएलडी पाणी देणार असल्याचे सुतोवाच मीरारोड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात केले होते. हे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण प्रशासनाने अतिरीक्त २५ एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून शहराला ७५ ऐवजी थेट १०० एमएलडी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या २६९ कोटींच्या ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची प्रक्रीया सुरु असून ते शहराला मिळण्यास सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावेळीही झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरासाठी तो काहीसा दिलासा देणारा असला तरी तो अपुराच ठरणार असल्याचे मत काही जलतज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले की, शहराला ७५ एमएलडी पाणी मिळणारच आहे. परंतु, अतिरीक्त २५ एमएलडी पाणी शहराला मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.