शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरचा भुयारी मार्ग मे अखेर होणार खुला

By admin | Updated: May 9, 2017 00:15 IST

बहुप्रतीक्षित पूर्व-पश्चिम भुयारी मार्ग मे अखेर खुला होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीला तब्बल आठ वर्षांनंतर पर्याय उपलब्ध होणार

राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : बहुप्रतीक्षित पूर्व-पश्चिम भुयारी मार्ग मे अखेर खुला होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीला तब्बल आठ वर्षांनंतर पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. २००५ पूर्वी पूर्व-पश्चिम येजा करण्याकरिता शहरात रेल्वे फाटकाचा एकमेव पर्याय होता. पालिकेने २००५ मध्ये दक्षिणेला इंदिरा गांधी उड्डाणपूल बांधल्याने रेल्वे फाटक बंद होऊन शहरातील वाहतुकीला उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाला. सध्या या एकमेव उड्डाणपुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने तो महत्त्वाचा ठरत आहे. दोन्ही बाजूंना शहरीकरण होत असून त्याप्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर वाहतूककोंडी नित्याची झाली असून त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना कोंडीतूनच मार्ग काढावा लागतो. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेहून वाहनचालकाला परस्पर विरुद्ध दिशेला जायचे झाल्यास त्याला उड्डाणपुलावरून जाण्यासाठी सुमारे पाच किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यातच कोंडीत सापडल्यास अर्ध्या तासाचे अंतर सुमारे तास-दीड तासावर जाते. यामुळे पालिकेने उड्डाणपुलाला पर्याय म्हणून २००९ मध्ये खाडीजवळ भुयारी वाहतूक मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा मार्ग बॉक्स पुशिंग पद्धतीने बांधण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी सुमारे ९ कोटी ५० लाखांची तरतूद केली. या कामाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने सल्लागारांच्या सूचनेनुसार आयआयटीमार्फत प्रकल्पाच्या जागेची तपासणी केली. त्यात प्रकल्पाच्या जागेत दलदल असल्याने बॉक्स पुशिंगऐवजी मायक्रो टनेल ट्रेन्चलेस पद्धतीचा वापर करण्याची सूचना केली. पालिकेने त्यासाठी सुमारे ४३ कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात केली. सुमारे ७० मीटर लांबी व १० मीटर रुंदीचा भुयारी वाहतूक मार्ग बांधण्याचे कंत्राट २५ मे २०११ रोजी घई कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. मार्ग पूर्ण करण्याची मुदत मे २०१४ पर्यंत होती. परंतु, रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवून पश्चिम दिशेला नवीन यार्ड बांधल्याने परिणामी भुयारी मार्ग सुमारे ६ मीटर खाली नेण्याची सूचना पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने २०१४ मधील महासभेने १७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली.