शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

तारापूर एमआयडीसीत नव्या कारखान्यांवर बंदी

By admin | Updated: September 23, 2016 03:00 IST

तारापूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून आपल्या क्षमतेपेक्षा (२५ एमएलडी) अधिक प्रदूषित सांडपाणी (४० त ४५ एमएलडी) समुद्रात सोडत असल्याचे केंद्रीय पर्यावरण नियंत्रण बोर्डाने हरित

हितेन नाईक, पालघरतारापूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून आपल्या क्षमतेपेक्षा (२५ एमएलडी) अधिक प्रदूषित सांडपाणी (४० त ४५ एमएलडी) समुद्रात सोडत असल्याचे केंद्रीय पर्यावरण नियंत्रण बोर्डाने हरित लवाद न्यायालयाकडे मान्य केल्याने त्यांचा खोटारडेपणा आता सर्वांसमोर उघडा पडला आहे. त्यामुळे तारापूर एमआयडीसीमध्ये नवीन कारखान्याच्या उभारणीस व असलेल्या कारखान्यांच्या विस्तारास परवानगी देऊ नये असे आदेश दिले आहेत.तारापूर मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना १ आॅगस्ट १९६० रोजी झाली. या कारखान्यामधून निघणारे रासायनिक, प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रथम २५ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीइटीपी) उभारणी करण्यात आली होती. मात्र कालांतराने या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत आज सुमारे २ हजार अतिधोकादायक, कमी धोकादायक व सामान्य कारखाने कार्यरत आहेत. त्यासाठी तब्बल ११३ कोटी रुपये किमतीच्या नवीन ५० एम एल डी अथवा त्या पेक्षा जास्त क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या प्रक्रि या केंद्रातून थेट पाईप लाईन समुद्रात ७.१ किमी अंतरावर टाकण्याचे काम सुरु होते. ती पाईपलाईन आपल्या गावातून जाण्याच्या परवानगीसाठी नवापूर ग्रामपंचायतीने एमआयडीसी कडून विकास निधीच्या नावावर लाखो रु पये घेतले होते. त्यामुळे ग्रामस्थासह मच्छीमार संतप्त झाले होते.अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तारापूर, तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याविरोधात हरित लवाद, पुणे न्यायालयात दाखल केलेल्या तारापूर एमआयडीसी विरुध्दच्या याचिकेची सुनावणी ९ सप्टें. रोजी झाली. समाज परिषदेच्या वकील गायत्री सिंग यांनी निदर्शनास आणून दिले की, तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाची सीईटीपी यंत्रणा सक्षम नाही आणि त्यामुळे कंपन्यांचे दूषित सांडपाणी परिसरातील समुद्र, खाड्या, नदी, नाले आणि शेता मध्ये सोडले जात आहे. सीईटीपी यंत्रणा २५ एमएलडी क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त (४०/४५ एम एल डी) सांडपाणी आजही बिनबोभाट सोडले जाते. ही धोकादायक परिस्थीती लक्षात घेऊन न्यायालयाने सीई टीपी विरोधात त्वरीत आदेश द्यावेत. तारापूर पर्यावरण संरक्षण समितीच्या विकलांनी न्यायालयास सांगण्याचा प्रयत्न केला की, आम्ही ५० एमएलडी क्षमतेची नविन पाइपलाइन समुद्रात टाकण्याचे काम हाती घेतले असून त्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून ती फेब्रुवारीपर्यंत कार्यान्वीत होईल. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वकिलांनी ४० ते ४५ एमएलडी पाणी समुद्रात सोडले जाते ही बाब न्यायालयात मान्य केली. केंद्रिय नियंत्रण बोर्डाने देखिल ही वस्तुस्थिती मान्य केली.