शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चिकू नुकसानीकरिता हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:05 IST

आनंद ठाकूर यांनी मांडला प्रश्न : शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक चिकूचे अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे चिकू बागायतदार आणि मजुरांना आर्थिक फटका बसला असून असून त्यांना तत्काळ मदत मिळावी याकरिता विधान परिषदेचे आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात बुधवार, १८ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना मांडली.

पालघर जिल्ह्यात चिकू हे प्रमुख फळपीक आहे. येथील पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, वसई आणि वाडा या तालुक्यांमध्ये बागायती असून त्याद्वारे सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. मात्र २७ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि दोन चक्रीवादळसदृश परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे झाडांवरील चिकूफळे, कळ्या गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिकदृष्ट्या हवालदिल बनला असून वर्षभर रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ बागायतीत काम करणाºया मजुरांवर ओढवल्याची बाब विधान परिषद आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. येथील उत्पादकांनी राज्याचे कृषीमंत्री, महसूल मंत्री तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांना लिखित निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल न घेतल्याने उत्पादकांमध्ये कमालीचा संताप असून तत्काळ या भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय भात, नागली, तूर आदी खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याचेही ठाकूर म्हणाले.

दरम्यान ९ डिसेंबर रोजी डहाणू पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघातर्फे चिकू बागायतदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी व बागायतदार यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आ. ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून चिकू पीक विम्याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले होते. मात्र यावेळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने आमदारांनी दिलेल्या वचनपूर्तीबाबत संभ्रमावस्था होती. परंतु त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शब्द पाळल्याने स्थानिकांत समाधानाची भावना असून त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल सोशल मीडियावर आभार व्यक्त होत आहेत.भरपाई मिळण्याची शेतकºयाला आशाचिकू नुकसानीचा प्रश्न या पूर्वी खासदार राजेंद्र गावीत यांनी संसदेत मांडून शेतकºयांना २५ हजार रुपये तर चिकू उत्पादकांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अधिवेशनाच्या माध्यमातून दोन्ही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील शेतकºयांचा प्रश्न उपस्थित केल्याने नुकसानभरपाई मिळण्याच्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.