शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

चिकू नुकसानीकरिता हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:05 IST

आनंद ठाकूर यांनी मांडला प्रश्न : शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक चिकूचे अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे चिकू बागायतदार आणि मजुरांना आर्थिक फटका बसला असून असून त्यांना तत्काळ मदत मिळावी याकरिता विधान परिषदेचे आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात बुधवार, १८ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना मांडली.

पालघर जिल्ह्यात चिकू हे प्रमुख फळपीक आहे. येथील पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, वसई आणि वाडा या तालुक्यांमध्ये बागायती असून त्याद्वारे सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. मात्र २७ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि दोन चक्रीवादळसदृश परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे झाडांवरील चिकूफळे, कळ्या गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिकदृष्ट्या हवालदिल बनला असून वर्षभर रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ बागायतीत काम करणाºया मजुरांवर ओढवल्याची बाब विधान परिषद आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. येथील उत्पादकांनी राज्याचे कृषीमंत्री, महसूल मंत्री तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांना लिखित निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल न घेतल्याने उत्पादकांमध्ये कमालीचा संताप असून तत्काळ या भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय भात, नागली, तूर आदी खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याचेही ठाकूर म्हणाले.

दरम्यान ९ डिसेंबर रोजी डहाणू पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघातर्फे चिकू बागायतदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी व बागायतदार यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आ. ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून चिकू पीक विम्याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले होते. मात्र यावेळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने आमदारांनी दिलेल्या वचनपूर्तीबाबत संभ्रमावस्था होती. परंतु त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शब्द पाळल्याने स्थानिकांत समाधानाची भावना असून त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल सोशल मीडियावर आभार व्यक्त होत आहेत.भरपाई मिळण्याची शेतकºयाला आशाचिकू नुकसानीचा प्रश्न या पूर्वी खासदार राजेंद्र गावीत यांनी संसदेत मांडून शेतकºयांना २५ हजार रुपये तर चिकू उत्पादकांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अधिवेशनाच्या माध्यमातून दोन्ही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील शेतकºयांचा प्रश्न उपस्थित केल्याने नुकसानभरपाई मिळण्याच्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.