शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

चिकू नुकसानीकरिता हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:05 IST

आनंद ठाकूर यांनी मांडला प्रश्न : शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील प्रमुख फळपीक चिकूचे अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे चिकू बागायतदार आणि मजुरांना आर्थिक फटका बसला असून असून त्यांना तत्काळ मदत मिळावी याकरिता विधान परिषदेचे आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात बुधवार, १८ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना मांडली.

पालघर जिल्ह्यात चिकू हे प्रमुख फळपीक आहे. येथील पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, वसई आणि वाडा या तालुक्यांमध्ये बागायती असून त्याद्वारे सर्वाधिक रोजगार निर्माण होतो. मात्र २७ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत झालेली अतिवृष्टी आणि दोन चक्रीवादळसदृश परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे झाडांवरील चिकूफळे, कळ्या गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिकदृष्ट्या हवालदिल बनला असून वर्षभर रोजगारापासून वंचित राहण्याची वेळ बागायतीत काम करणाºया मजुरांवर ओढवल्याची बाब विधान परिषद आ. आनंद ठाकूर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बुधवारी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. येथील उत्पादकांनी राज्याचे कृषीमंत्री, महसूल मंत्री तसेच पालघर जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक यांना लिखित निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल न घेतल्याने उत्पादकांमध्ये कमालीचा संताप असून तत्काळ या भागाची पाहणी करून आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय भात, नागली, तूर आदी खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याचेही ठाकूर म्हणाले.

दरम्यान ९ डिसेंबर रोजी डहाणू पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघातर्फे चिकू बागायतदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी व बागायतदार यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात आ. ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून चिकू पीक विम्याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले होते. मात्र यावेळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने आमदारांनी दिलेल्या वचनपूर्तीबाबत संभ्रमावस्था होती. परंतु त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शब्द पाळल्याने स्थानिकांत समाधानाची भावना असून त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल सोशल मीडियावर आभार व्यक्त होत आहेत.भरपाई मिळण्याची शेतकºयाला आशाचिकू नुकसानीचा प्रश्न या पूर्वी खासदार राजेंद्र गावीत यांनी संसदेत मांडून शेतकºयांना २५ हजार रुपये तर चिकू उत्पादकांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अधिवेशनाच्या माध्यमातून दोन्ही लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील शेतकºयांचा प्रश्न उपस्थित केल्याने नुकसानभरपाई मिळण्याच्या बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.