शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

अर्नाळा किल्ला गावाला तडाखा

By admin | Updated: June 25, 2017 03:51 IST

धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने अर्नाळा गावात समुद्र तब्बल १५० फूट घुसला आहे. त्यामुळे मोठ्या उधाणात किनाऱ्यावरील घरे वाहून जात आहेत

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने अर्नाळा गावात समुद्र तब्बल १५० फूट घुसला आहे. त्यामुळे मोठ्या उधाणात किनाऱ्यावरील घरे वाहून जात आहेत. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास आलेल्या उधणाच्या लाटांनी गावातील चार घरे वाहून गेली तर तीन घरांची पडझड झाली. अनेक झाडेही वाहून गेली. गेल्या तीन वर्षांपासून उधणाच्या लाटा घरे गिळंकृत करीत असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.अर्नाळा किल्ला हे साडे चार हजार लोकवस्ती आणि ४३५ घरांचे गाव आहे. गावाला चारही बाजूने समुद्राने वेढले आहे. त्याच्या समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने मोठया लाटांनी किनारा उद्धवस्त केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात उधाणाच्या लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यालगतची घरे वाहून जात आहेत. सुमती म्हात्रे या अपंग महिलेला मिळालेले घरकुल वाहून गेले. त्याचबरोबर अनुसया मेहेर, भरत मेहेर, लक्ष्मण मेहेर यांची घरे वाहून गेली.किनारा वाचवण्यासाठी ५०० मीटरच्या धूपप्रतिबंधक किनाऱ्याची गरज आहे. माजी सरपंच आणि पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. तेव्हा गेल्या वर्षी १०० मीटरचा बंधारा मंजूर होऊन १ कोटी ३० लाख रुपये मेरी टाईम बोर्डाकडे जमा झाले आहेत. निविदा प्रक्रि या होऊन ठेकेदार नेमला गेला आहे. मात्र सीआरझेड चा अडथळा आल्याने मेरी टाईम बोर्डाने काम सुरू केलेले नाही.मेहेर यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सीआरझेड चा अडथळा दूर केला आहे. त्यानंतरही बंधाऱ्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या पावसाळ्यात समुद्र गावात घुसून मोठी हानी होणार असल्याची भीती मेहेर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आमदार तसेच खासदार आणि पालकमंत्र्यांनीही तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.